तू खुद की खोज में निकल; तू किसलिए हताश हैं ?
तू चल; तेरे वजूद की, समय को भी तलाश हैं !!धृ!!
जो तुझसे लिपटी बेडीयाँ; समझ ना इनको वस्त्र तू !
ये बेडीयाँ पिघालकर; बना ले इनको शस्त्र तू !!१!!
चरित्र जब पवित्र हैं; तो क्यूं हैं यह दशा तेरी ?
के पापियोंको हक नहीं; के ले यह परीक्षा तेरी !!२!!
चुनर उडाके ध्वज बना; गगन भी कपकपाएगा !
जो तेरी चुनर गिरी; तो भूकंप आ जायेगा !!३!!
तू खुद की खोज में निकल; तू किसलिए हताश हैं ?
तू चल; तेरे वजूद की, समय को भी तलाश हैं !!धृ!!
---- तन्वीर कौसी / गाझी
"पिंक" संपताना अमिताभच्या आवाजातली ही कविता स्त्री शक्तीला आवाहन करतानाच २१ व्या शतकातल्या तथाकथित सुधारक भारतीय समाजापुढे एक जबरदस्त प्रश्न उभा करते आणि आपल्याला आरशासमोर उभे करत एक चित्रपट संपतो.
वर वर पहाता आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक दृष्ट्या स्वतंत्र व स्वावलंबी असलेल्या आजच्या स्त्री च्या पुढे, आजही परंपरागत मानसिकतेच्या जाळ्यात अडकलेल्या समाजातील विविध घटकांकडून कसे वेगवेगळे प्रश्न उभे केले जातात, तथाकथित मानदंडाच्या समोर त्यांच्या चारित्र्याचं, वागणूकीचं कसं ठराविक साच्यातलं मूल्यमापन केलं जातं आणि एक सामाजिक व्यवस्था म्हणून पुरूष आणि स्त्री यांच्या बाबतीत आपण कसे दुहेरी मापदंड वापरतो हे in our face पद्धतीने दाखवणारा पिंक.
मीनल, फलक आणि अँड्रीया - तीन सामान्य मध्यमवर्गीय, कमावत्या स्वतंत्र विचारसरणीच्या मुली. आधुनिक भारतातील आधुनिक मुली असल्यामुळे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असल्यामुळे घरापासून दूर मैत्रिणीबरोबर एकत्र रहाणे, मुलांसोबत मैत्री करणे, आपल्याच एका मित्राच्या मित्रांबरोबर डिनर ला जाणे, ड्रिंक्स घेणे, ह्या त्यांच्या दृष्टीने सहज व्यवहारातल्या गोष्टी आहेत. आजच्या पुढारलेल्या भारतीय समाजाच्या स्त्री पुरषाना समान लेखणाऱ्या मानसिकतेचं द्योतक ही आहेत. पण हे खरंच असं आहे ?
एका rock concert नंतर, विश्वा नावाच्या आपल्या मित्राच्या मित्रांबरोबर - राजवीर व डंपी - एका रिसॉर्ट वर जाऊन डिनर व ड्रिंक्स घेताना घटनाना विकृत व विचित्र वळण लागतं आणि स्वत:च्या अब्रूचं रक्षण करताना मीनलच्या हातून राजवीर ला गंभीर जखम होते आणि वरवर स्त्रीपुरुष समानता मानणाऱ्या आधुनिक समाजातील विसंगती आणि विकृत चेहरा समोर येतो.
सत्ता व पैसा दोन्हीचं पाठबळ असलेले राजवीर व त्याचे मित्र, स्वत:च्या पौरूषाचा अवमान करणाऱ्या मीनलला धडा शिकवायचं ठरवतात. त्यासाठी त्यांच्या घरमालकाला त्यांच्या तथाकथित वाईट चारित्र्याबद्दल सांगून त्याना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न, मीनल पोलिसात गेली हे कळल्यावर तिचं अपहरण करून विनयभंग करणं अशा प्रकारे ते या मुलीना दहशत घालण्याचा प्रयत्न करतात आणि तरी ही जेव्हा या मुली स्वाभिमाना साठी लढायचं ठरवतात तेव्हा आपल्या हातातील सत्ता आणि पैशांचा वापर करून त्यांच्यावरच त्या वेश्याव्यवसाय करत असल्याचा व पैशासाठी राजवीर वर खुनी हल्ला केल्याचा आरोप करून मीनलला तुरूंगात पाठवतात.
या सगळ्या दरम्यान, शेजारी, ओळखीचे, नोकरीतील सहकारी या सर्वांची मानसिकता त्यांना या समाजाची खरी ओळख घडवते.
आणि अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीला येतो त्यांच्याच कॉलनीत रहाणारा, bipolar disorder मुळे वकिली बंद केलेला पण अतिशय बुद्धिमान व आपल्या उमेदीच्या काळात प्रथितयश म्हणून गाजलेला ॲड. दीपक सेहगल.
आणि मग सुरू होतात कोर्टरूम मधले वाद प्रतिवाद. घरापासून दूर मैत्रिणीबरोबर एकत्र रहाणे, मुलांसोबत मैत्री करणे, आपल्याच एका मित्राच्या मित्रांबरोबर डिनर ला जाणे, ड्रिंक्स घेणे, स्कर्ट्स घालणे शॉर्ट्स घालणे हे सगळं वाईट चारित्र्याचेच दाखले आहेत व असे वागणाऱ्या मुली या सेक्स साठी easily available असतातच ; या मानसिकतेतून सुरू झालेला खटला - एका बाजूला स्वत:च्या स्वत्वासाठी लढणाऱ्या तीन मुली आणि दुसऱ्या बाजूला एक सामाजिक मानसिकता यांच्या मधला लढा.
मीनल, फलक व ॲंड्रीया यांचं पद्धतशीरपणे चारित्र्यहनन करून त्यांना धंदेवाईक ठरवण्याचे वकिली डावपेच आणि या सगळ्यात मानसिकदृष्ट्या होरपळून निघणाऱ्या तीन मुली. त्याना एकच आधार आहे - दीपक सेहगल आणि त्याचं वकिली कौशल्य.
राजवीर व कंपू नी नोंदवलेली तक्रार कशी back dated आणि सूडाच्या भावनेतून केलेली आहे आणि हे करण्यात पोलीस यंत्रणेचा असलेला हात दीपक सेहगल अचूकपणे दाखवून मूळ आरोपातील हवा काढून घेतो तो प्रसंग, ज्या दबावतंत्राचा वापर करून राजवीरचा वकील फलक कडून पैसे घेतले नसतानाही पैसे घेतल्याचं वदवून घेतो त्याच दबाव तंत्राचा वापर करत आणि राजवीर च्या शीघ्रकोपी स्वभावाचा व परंपरागत पुरषी मानसिकतेचा फायदा घेत दीपक सेहगल त्याच्या तोंडून त्याची मानसिकता कोर्टापुढे आणतो तो सीन आणि आधुनिक काळात मुलीच्या नैतिक वागणूकीचे नियम बनवून सर्व समाजाच्या पदरात त्याचं दुटप्पीपणा घालणारा दीपक सेहगल - हे काही प्रसंग विशेष लक्षात रहातात.
या सगळ्या प्रकारात क्वचित एकमेकींशी मतभेद झाले तरी आपण न्याय्य गोष्टी साठी व स्वत्वा साठी लढायला हवं ही जाणीव ठेऊन एकमेकीना सांभाळणाऱ्या तिघी मुली.
या त्यांच्या लढ्याचं शेवटी काय होतं ? त्यासाठी चित्रपट पहायला हवा.
दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरीने अतिशय समतोलपणे व तितक्याच थेट पद्धतीने संपूर्ण चित्रपट हाताळलाय.
मीनलच्या भूमिकेत तापसी पन्नू, फलक च्या भूमिकेत किर्ती कुलहारी व ॲंड्रीया च्या भूमिकेत ॲंड्रीया या तिघींचीही कामं सुरेख. त्यांची भिती, गोंधळ, अगतिकता आणि शेवटी लढायचा निश्चय आणि या प्रवासातले भावनिक चढ उतार अतिशय प्रभावी.
आणि दीपक सेहगलच्या भूमिकेत the one & only अमिताभ बच्चन. या अभिनेत्याच्या बाबतीत आता कोणतेही कौतुकाचे शब्द थिटे वाटतात. One needs to watch him portray Ad. Deepak Sehgal. भूमिकेचा बाज, देहबोली, आवाज, चेहऱ्यावरील भाव - he is just awesome.
पण चित्रपटाच्या या सगळ्या यशस्वी बाबींशिवाय एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्या समाजाच्या एकाच परिस्थितीत पुरूष व स्त्री यांच्यासाठी वेगळे मापदंड लावण्याच्या दुटप्पीपणावर रोखलेलं बोट आणि केलेला प्रश्न.
स्त्री च्या वैयक्तिक निवड व निर्णय स्वातंत्र्याला आपण एक समाज म्हणून खरोखर समान पातळीवर स्विकारणार आहोत की नाही आणि जर ते तसं स्विकारायचं असेल तर तसा समाज निर्माण करण्यासाठी आपल्या मुलाना वाचवणं ( save boys) गरजेचं आहे. त्याना वाचवायचय परंपरागत पुरूषप्रधान अशा मानसिकतेपासून जी जन्मापासून सामाजिक व्यवस्थेतून त्यांच्यावर बिंबवली जाते आणि त्यासाठी बदलायला हवं आपण.
शेवटी दीपक सेहगल म्हणतो त्याप्रमाणे " No " हा एक शब्द नसून ते एक नि:संदिग्ध वाक्य आहे ज्याला कुठल्याही इतर शब्दाची वा स्पष्टीकरणाची गरज नाही हे कळणारा आणि ते कळून त्या निर्णयाचा आदर करणारा - मैत्रिणीच्या बाबतीत, ओळखीच्या मुलीच्या बाबतीत, एखाद्या वेश्येच्या बाबतीत किंवा स्वत:च्या पत्नीच्या बाबतीत देखील - No म्हणजे नाही हे स्विकारून त्या निर्णयाचा मान राखणारा समाज निर्माण करणं ही गरज आहे.
आणि हे असं करून होणार नाही की पुरषानी मोठेपणा दाखवून स्त्रियांच्या मताचा आदर केला तर हे तेव्हा होइल की व्यक्ती म्हणून हे मतस्वातंत्र्य व निर्णयस्वातंत्र्य दोघानाही सारखंच आहे ही जाणीव संपूर्ण समाजात रुजलेली असेल तेव्हा.
आणि तरच आणि तेव्हाच चित्रपटाच्या पोस्टरमधले ते बंदिवान करणारे गज नाहीसे होतील.
---- मनिष मोहिले
तू चल; तेरे वजूद की, समय को भी तलाश हैं !!धृ!!
जो तुझसे लिपटी बेडीयाँ; समझ ना इनको वस्त्र तू !
ये बेडीयाँ पिघालकर; बना ले इनको शस्त्र तू !!१!!
चरित्र जब पवित्र हैं; तो क्यूं हैं यह दशा तेरी ?
के पापियोंको हक नहीं; के ले यह परीक्षा तेरी !!२!!
चुनर उडाके ध्वज बना; गगन भी कपकपाएगा !
जो तेरी चुनर गिरी; तो भूकंप आ जायेगा !!३!!
तू खुद की खोज में निकल; तू किसलिए हताश हैं ?
तू चल; तेरे वजूद की, समय को भी तलाश हैं !!धृ!!
---- तन्वीर कौसी / गाझी
"पिंक" संपताना अमिताभच्या आवाजातली ही कविता स्त्री शक्तीला आवाहन करतानाच २१ व्या शतकातल्या तथाकथित सुधारक भारतीय समाजापुढे एक जबरदस्त प्रश्न उभा करते आणि आपल्याला आरशासमोर उभे करत एक चित्रपट संपतो.
वर वर पहाता आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक दृष्ट्या स्वतंत्र व स्वावलंबी असलेल्या आजच्या स्त्री च्या पुढे, आजही परंपरागत मानसिकतेच्या जाळ्यात अडकलेल्या समाजातील विविध घटकांकडून कसे वेगवेगळे प्रश्न उभे केले जातात, तथाकथित मानदंडाच्या समोर त्यांच्या चारित्र्याचं, वागणूकीचं कसं ठराविक साच्यातलं मूल्यमापन केलं जातं आणि एक सामाजिक व्यवस्था म्हणून पुरूष आणि स्त्री यांच्या बाबतीत आपण कसे दुहेरी मापदंड वापरतो हे in our face पद्धतीने दाखवणारा पिंक.
मीनल, फलक आणि अँड्रीया - तीन सामान्य मध्यमवर्गीय, कमावत्या स्वतंत्र विचारसरणीच्या मुली. आधुनिक भारतातील आधुनिक मुली असल्यामुळे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असल्यामुळे घरापासून दूर मैत्रिणीबरोबर एकत्र रहाणे, मुलांसोबत मैत्री करणे, आपल्याच एका मित्राच्या मित्रांबरोबर डिनर ला जाणे, ड्रिंक्स घेणे, ह्या त्यांच्या दृष्टीने सहज व्यवहारातल्या गोष्टी आहेत. आजच्या पुढारलेल्या भारतीय समाजाच्या स्त्री पुरषाना समान लेखणाऱ्या मानसिकतेचं द्योतक ही आहेत. पण हे खरंच असं आहे ?
एका rock concert नंतर, विश्वा नावाच्या आपल्या मित्राच्या मित्रांबरोबर - राजवीर व डंपी - एका रिसॉर्ट वर जाऊन डिनर व ड्रिंक्स घेताना घटनाना विकृत व विचित्र वळण लागतं आणि स्वत:च्या अब्रूचं रक्षण करताना मीनलच्या हातून राजवीर ला गंभीर जखम होते आणि वरवर स्त्रीपुरुष समानता मानणाऱ्या आधुनिक समाजातील विसंगती आणि विकृत चेहरा समोर येतो.
सत्ता व पैसा दोन्हीचं पाठबळ असलेले राजवीर व त्याचे मित्र, स्वत:च्या पौरूषाचा अवमान करणाऱ्या मीनलला धडा शिकवायचं ठरवतात. त्यासाठी त्यांच्या घरमालकाला त्यांच्या तथाकथित वाईट चारित्र्याबद्दल सांगून त्याना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न, मीनल पोलिसात गेली हे कळल्यावर तिचं अपहरण करून विनयभंग करणं अशा प्रकारे ते या मुलीना दहशत घालण्याचा प्रयत्न करतात आणि तरी ही जेव्हा या मुली स्वाभिमाना साठी लढायचं ठरवतात तेव्हा आपल्या हातातील सत्ता आणि पैशांचा वापर करून त्यांच्यावरच त्या वेश्याव्यवसाय करत असल्याचा व पैशासाठी राजवीर वर खुनी हल्ला केल्याचा आरोप करून मीनलला तुरूंगात पाठवतात.
या सगळ्या दरम्यान, शेजारी, ओळखीचे, नोकरीतील सहकारी या सर्वांची मानसिकता त्यांना या समाजाची खरी ओळख घडवते.
आणि अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीला येतो त्यांच्याच कॉलनीत रहाणारा, bipolar disorder मुळे वकिली बंद केलेला पण अतिशय बुद्धिमान व आपल्या उमेदीच्या काळात प्रथितयश म्हणून गाजलेला ॲड. दीपक सेहगल.
आणि मग सुरू होतात कोर्टरूम मधले वाद प्रतिवाद. घरापासून दूर मैत्रिणीबरोबर एकत्र रहाणे, मुलांसोबत मैत्री करणे, आपल्याच एका मित्राच्या मित्रांबरोबर डिनर ला जाणे, ड्रिंक्स घेणे, स्कर्ट्स घालणे शॉर्ट्स घालणे हे सगळं वाईट चारित्र्याचेच दाखले आहेत व असे वागणाऱ्या मुली या सेक्स साठी easily available असतातच ; या मानसिकतेतून सुरू झालेला खटला - एका बाजूला स्वत:च्या स्वत्वासाठी लढणाऱ्या तीन मुली आणि दुसऱ्या बाजूला एक सामाजिक मानसिकता यांच्या मधला लढा.
मीनल, फलक व ॲंड्रीया यांचं पद्धतशीरपणे चारित्र्यहनन करून त्यांना धंदेवाईक ठरवण्याचे वकिली डावपेच आणि या सगळ्यात मानसिकदृष्ट्या होरपळून निघणाऱ्या तीन मुली. त्याना एकच आधार आहे - दीपक सेहगल आणि त्याचं वकिली कौशल्य.
राजवीर व कंपू नी नोंदवलेली तक्रार कशी back dated आणि सूडाच्या भावनेतून केलेली आहे आणि हे करण्यात पोलीस यंत्रणेचा असलेला हात दीपक सेहगल अचूकपणे दाखवून मूळ आरोपातील हवा काढून घेतो तो प्रसंग, ज्या दबावतंत्राचा वापर करून राजवीरचा वकील फलक कडून पैसे घेतले नसतानाही पैसे घेतल्याचं वदवून घेतो त्याच दबाव तंत्राचा वापर करत आणि राजवीर च्या शीघ्रकोपी स्वभावाचा व परंपरागत पुरषी मानसिकतेचा फायदा घेत दीपक सेहगल त्याच्या तोंडून त्याची मानसिकता कोर्टापुढे आणतो तो सीन आणि आधुनिक काळात मुलीच्या नैतिक वागणूकीचे नियम बनवून सर्व समाजाच्या पदरात त्याचं दुटप्पीपणा घालणारा दीपक सेहगल - हे काही प्रसंग विशेष लक्षात रहातात.
या सगळ्या प्रकारात क्वचित एकमेकींशी मतभेद झाले तरी आपण न्याय्य गोष्टी साठी व स्वत्वा साठी लढायला हवं ही जाणीव ठेऊन एकमेकीना सांभाळणाऱ्या तिघी मुली.
या त्यांच्या लढ्याचं शेवटी काय होतं ? त्यासाठी चित्रपट पहायला हवा.
दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरीने अतिशय समतोलपणे व तितक्याच थेट पद्धतीने संपूर्ण चित्रपट हाताळलाय.
मीनलच्या भूमिकेत तापसी पन्नू, फलक च्या भूमिकेत किर्ती कुलहारी व ॲंड्रीया च्या भूमिकेत ॲंड्रीया या तिघींचीही कामं सुरेख. त्यांची भिती, गोंधळ, अगतिकता आणि शेवटी लढायचा निश्चय आणि या प्रवासातले भावनिक चढ उतार अतिशय प्रभावी.
आणि दीपक सेहगलच्या भूमिकेत the one & only अमिताभ बच्चन. या अभिनेत्याच्या बाबतीत आता कोणतेही कौतुकाचे शब्द थिटे वाटतात. One needs to watch him portray Ad. Deepak Sehgal. भूमिकेचा बाज, देहबोली, आवाज, चेहऱ्यावरील भाव - he is just awesome.
पण चित्रपटाच्या या सगळ्या यशस्वी बाबींशिवाय एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्या समाजाच्या एकाच परिस्थितीत पुरूष व स्त्री यांच्यासाठी वेगळे मापदंड लावण्याच्या दुटप्पीपणावर रोखलेलं बोट आणि केलेला प्रश्न.
स्त्री च्या वैयक्तिक निवड व निर्णय स्वातंत्र्याला आपण एक समाज म्हणून खरोखर समान पातळीवर स्विकारणार आहोत की नाही आणि जर ते तसं स्विकारायचं असेल तर तसा समाज निर्माण करण्यासाठी आपल्या मुलाना वाचवणं ( save boys) गरजेचं आहे. त्याना वाचवायचय परंपरागत पुरूषप्रधान अशा मानसिकतेपासून जी जन्मापासून सामाजिक व्यवस्थेतून त्यांच्यावर बिंबवली जाते आणि त्यासाठी बदलायला हवं आपण.
शेवटी दीपक सेहगल म्हणतो त्याप्रमाणे " No " हा एक शब्द नसून ते एक नि:संदिग्ध वाक्य आहे ज्याला कुठल्याही इतर शब्दाची वा स्पष्टीकरणाची गरज नाही हे कळणारा आणि ते कळून त्या निर्णयाचा आदर करणारा - मैत्रिणीच्या बाबतीत, ओळखीच्या मुलीच्या बाबतीत, एखाद्या वेश्येच्या बाबतीत किंवा स्वत:च्या पत्नीच्या बाबतीत देखील - No म्हणजे नाही हे स्विकारून त्या निर्णयाचा मान राखणारा समाज निर्माण करणं ही गरज आहे.
आणि हे असं करून होणार नाही की पुरषानी मोठेपणा दाखवून स्त्रियांच्या मताचा आदर केला तर हे तेव्हा होइल की व्यक्ती म्हणून हे मतस्वातंत्र्य व निर्णयस्वातंत्र्य दोघानाही सारखंच आहे ही जाणीव संपूर्ण समाजात रुजलेली असेल तेव्हा.
आणि तरच आणि तेव्हाच चित्रपटाच्या पोस्टरमधले ते बंदिवान करणारे गज नाहीसे होतील.
---- मनिष मोहिले
No comments:
Post a Comment