नुकताच श्रीमती काजल ओझा लिखित गुजराती पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचला "कृष्णायन" नावाचा. महाभारताचा कर्ता करविता असलेल्या कृष्णाची, लेखिका एका वेगळ्याच दृष्टीकोनातून ओळख करून देते आपल्याशी.
पारध्याचा बाण पायाच्या अंगठ्याला लागण्याच्या निमीत्ताने कृष्णानी महाप्रयाण केलं.
ईश्वर असून सुद्धा मानवी देह धारण केल्यामुळे मनुष्याच्या भाव भावनानी ते रुप सुद्धा बांधलं गेलं. तर मृत्यूशय्येवर या मानव अवतारात असलेल्या परमात्म्याचा अंश असलेल्या कृष्णाच्या मनात कोणाकोणाबद्दल काय विचार नी आठवणी आल्या असतील - मुख्यत्वेकरून राधा, रुक्मिणी आणि द्रौपदीबद्दल - असा विषय आहे पुस्तकाचा.
आणि हाच धागा पकडून, कल्पनाविलासाचा आधार घेत पण महाभारताची मुख्य विचारधारा बैठक न सोडता लेखिका कृष्णाच्या आणि त्याच्या
जीवनातील तीन महत्वाच्या स्त्रियांच्या भावनिक संबंधांचा सुरेख शब्दालेख आपल्या समोर आणते.
संपूर्ण स्विकार आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा उत्सव साजरा करणं, ही लेखिकेच्या मते श्रीकृष्णाच्या जीवनगाथेची मर्म असलेली सूत्र या भावसंबंध कथनातून लेखिका आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते.
तर मला आकळलेल्या या कृष्णायनाला शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न.
कृष्णायन
जीवन जगणे उत्सव असते
क्षणा क्षणाचा उत्सव करते
नदी जशी सागरास मिळते
जन्मातून मोक्षाप्रत जाते
स्वीकारातच जीवन फुलते
विना अटीचे प्रेमही स्फुरते
मात पिता भगिनी अन् भ्राते
प्रिया, सहचरी; सखीचे नाते
जे जे कोमल राधा असते
सखी द्रौपदी मनात वसते
अर्धांगिनी अन् रुक्मिणी असते
कृष्णाशी जी समरस असते
जेव्हा मन अहं ला त्यागते
परमतत्वाशी जुळते नाते
परमानंदे जीवन खुलते
कृष्णाला योगेश्वर बनविते
-- मनिष मोहिले
पारध्याचा बाण पायाच्या अंगठ्याला लागण्याच्या निमीत्ताने कृष्णानी महाप्रयाण केलं.
ईश्वर असून सुद्धा मानवी देह धारण केल्यामुळे मनुष्याच्या भाव भावनानी ते रुप सुद्धा बांधलं गेलं. तर मृत्यूशय्येवर या मानव अवतारात असलेल्या परमात्म्याचा अंश असलेल्या कृष्णाच्या मनात कोणाकोणाबद्दल काय विचार नी आठवणी आल्या असतील - मुख्यत्वेकरून राधा, रुक्मिणी आणि द्रौपदीबद्दल - असा विषय आहे पुस्तकाचा.
आणि हाच धागा पकडून, कल्पनाविलासाचा आधार घेत पण महाभारताची मुख्य विचारधारा बैठक न सोडता लेखिका कृष्णाच्या आणि त्याच्या
जीवनातील तीन महत्वाच्या स्त्रियांच्या भावनिक संबंधांचा सुरेख शब्दालेख आपल्या समोर आणते.
संपूर्ण स्विकार आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा उत्सव साजरा करणं, ही लेखिकेच्या मते श्रीकृष्णाच्या जीवनगाथेची मर्म असलेली सूत्र या भावसंबंध कथनातून लेखिका आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते.
तर मला आकळलेल्या या कृष्णायनाला शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न.
कृष्णायन
जीवन जगणे उत्सव असते
क्षणा क्षणाचा उत्सव करते
नदी जशी सागरास मिळते
जन्मातून मोक्षाप्रत जाते
स्वीकारातच जीवन फुलते
विना अटीचे प्रेमही स्फुरते
मात पिता भगिनी अन् भ्राते
प्रिया, सहचरी; सखीचे नाते
जे जे कोमल राधा असते
सखी द्रौपदी मनात वसते
अर्धांगिनी अन् रुक्मिणी असते
कृष्णाशी जी समरस असते
जेव्हा मन अहं ला त्यागते
परमतत्वाशी जुळते नाते
परमानंदे जीवन खुलते
कृष्णाला योगेश्वर बनविते
-- मनिष मोहिले