Sunday, November 29, 2015

तेरा इसक

जो घुल गया हैं सासोंमें
तेरे ही इसक का रंग हैं

सुबह की लाली जैसा
तरोताजा हरियाली जैसा
आकाश की निलीमा जैसा
गुलाबी सा गुलाब जैसा
घोल दूॅं इसक के पानी में
तो यह रंग सारे दिखाता हैं
जो घुल गया हैं सासोंमें
तेरे ही इसक का रंग हैं

जो घुल गयी हैं सासोंमें
तेरे ही इसक की खूशबू हैं

भिनी मिट्टीके सुगंध जैसी
फूलोंसे लदे बागानोसी
तेरी गीले घने जुल्फों जैसी
वादीयोंमें झूमती हवाओंसी
घोल दूॅं इन्हें मेरी साॅंसोंमें
तेरा बदन मुझमें महकता हैं
जो घुल गयी हैं सासोंमें
तेरे ही इसक की खूशबू हैं

जो घुल गयी हैं सासोंमें
तेरे ही इसक की आवाज हैं

पछियोंके किलबिलाहटसी
झरनोंकी झनझनाहटसी
मेघोंके पखवाजोंसी
बारीश की रिमझिम जैसी
घोल दूॅं इन्हे जहम में मेरी
लबोंपर इसकही आता हैं
जो घुल गयी हैं सासोंमें
तेरे ही इसक की आवाज हैं

जो घुल गया हैं सासोंमें
तेरे ही इसक का रंग हैं

-------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Friday, November 27, 2015

रंग जिंदगी के

थामा जो हाथ तेरा
महसूस यह हुआ हैं
के राह पर जिंदगी के
हमसफर मुझे मिला हैं

देखा जो आॅंखो में तेरी
एक उम्मीदसी जगी हैं
खूबसूरत से ख्वाब मेरी,
हसीन नींदे बना रहे हैं

सुन ली जो खिलखिलाहट
तेरे हॅंसी की मासूम
कोई सुरीली धून को
मन मेरा भी गा रहा हैं

चेहरा यह देखकर तेरा
जीने लगा हूॅं फिरसे
मुश्कीलसे जिंदगी के
रंग हाथ आ गए हैं

------ मनिष मोहिले 

सहिष्णुता

देशाच्या सीमेवरती
अर्पितात प्राण कोणी
वाफा फुका मुखीच्या
आणि दवडतात कोणी

ना हाव प्रसिद्धीची
ना संपत्तीचा मोह
अद्भुत काम करताती
नाही कुठेच नाव

हे सितारे पडद्यावरले
जन डोक्यावरती घेती
अती सुख टोचते त्यांना
मुखी बोले विपरीत बुद्धी

देशासाठी झिजती मरती
सामान्य ही माणसे किती ती
बिरुदे धर्म जातीची
त्यांच्या देशप्रेमा न नडती

ही कोल्हेकुई दांभिक
थांबवा आता तात्काळ
जर असाल प्रामाणिक
डोकवा अंतरंगात

नागरी कायदा एकसमान
यावा म्हणून करा प्रयत्न
सहिष्णुतेवर बोलण्यासाठी
लायक तेव्हाच ठराल

------  © मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com

Thursday, November 19, 2015

एम टी आयवा मारू

माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक. नाव वाचूनच उत्सुकता निर्माण होते की नक्की काय आहे हे पुस्तक ? कशाबद्दल ?

तर एम टी आयवा मारू ही अनंत सामंत यांची एक कादंबरी आहे जी आधुनिक मराठी साहित्यातील एक विशेष उल्लेखनीय कादंबरी ठरावी - तिच्या धीट आधुनिक शैलीमुळे,  पठडी बाहेरच्या हाताळणीमुळे.

एम टी म्हणजे मोटर टॅंकर. तर ही कहाणी  आहे आयवा मारू नावाच्या बोटीची,  तिच्या सागर प्रवासाची आणि त्या प्रवासातील सागरातील वादळे आणि बोटीवरच्या प्रवाशांच्या भावनिक वादळांची.

सेकंड ऑफीसर अनंत सामंत, सेकंड इंजिनीयर दीपक उपाध्याय, चीफ ऑफीसर पॅट्रीक अॅडॅम्स, थर्ड ऑफीसर डालीझे, रेडीओ ऑफीसर चांद, कॅडेट सेनगुप्ता, त्याची आई मिसेस सेनगुप्ता, वृद्ध अनुभवी खलाशी बोसन,  अत्यंत अनुभवी तडफदार कॅप्टन रॉस, अनंतची प्रेयसी अॅना आणि मिसेस उज्ज्वला दीपक उपाध्याय - ही आहेत ती पात्र जी आयवा मारुचा हा प्रवास आणि कहाणी रंगतदार बनवतात.

आयवा मारू - हॉंगकॉंगच्या कॉर्ड्स शिपींग च्या शहात्तर शिप्सपैकी एक. ब्रेकींग यार्डला पाठवायचं नक्की झालेली ही मोडकळीला आलेली शिप परत समुद्रसफरीसाठी बाहेर काढतात कारण तिच्या मालकाला आपली ही पहिली लकी शिप परत नवीन करायची असते.

त्याचसाठी सगळा अनुभवी आणि त्यातूनही आयवा मारू वर पूर्वी कामाचा अनुभव असलेला Crew मुद्दामून गोळा केला जातो.
व्यापारी वृत्तीची कॉर्ड्स आयवा मारूला हॉंगकॉंगहून सरळ योकोहामाला नूतनीकरणासाठी न पाठवता शिंतावला व्यापारी सफरीवर पाठवते - बरीचशी डागडुजी न करताच. पण कॅप्टन रॉसला आयवा मारूच्या दर्यावर्दी असण्याबद्दल जशी खात्री असते तशीच खात्री व सार्थ आत्मविश्वास असतो स्वत:च्या अनुभवाचा व नैपुण्याचा.

सफर सुरू होते. बोटीवरील शिस्तीची दिनचर्या खेळीमेळीत अंगी भिनू लागते. सगळं काही नेहमी प्रमाणेच चालू असतं. पण सगळंच नाही.

मिसेस उज्ज्वला उपाध्याय सफरीच्या सुरूवातीपासून जहाजावर आलेली असते.
एक सरळ साधी सुंदर नवपरिणिता. तिला तिच्या नवऱ्याशिवाय - दीपक उपाध्याय शिवाय दुसरं कुणीच नसतं म्हणून ती जहाजावर येते. जिंदादिल खलाशांचं समुद्रावरचं बेदरकार बिनधास्त धाडशी आयुष्य जवळून बघायला मिळेल अशा भाबड्या विचारानी आलेली असते.

पण प्रवासात घडणाऱ्या घटना वेगळंच वळण घेतात.  खेळीमेळीचं मोकळं वातावरण संशयी बनत जातं. सरणाऱ्या दर दिवसाबरोबर गढूळत जातं; आणि प्रत्येक अशा घटनेचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध असतो उज्ज्वला उपाध्यायशी.

प्रत्येकाची वागणूक मूळ स्वभावाशी दिवसेंदिवस फारकत घेत असते. सर्वात जास्त उज्ज्वलाच्या बाबतीत.

त्यात भरीस भर म्हणून सागरावरची वादळं, मोडकळीस आलेल्या आयवा मारूला तरंगत ठेवण्याचा आणि तिला योकोहामाला नेऊन एखाद्या नववधू प्रमाणे सजवण्याचा  कॅप्टन रॉसचा आत्यंतिक आग्रह आणि कॉर्ड्सची व्यापारी वृत्ती या सगळ्या गोष्टी परिस्थिती अधिकच नाजूक बनवतात.

आणि या सगळ्याच्या मध्यभागी कथानायक अनंत. कॅप्टन रॉसचा विश्वासू, दीपकचा जीवश्च कंठश्च मित्र, अॅनाचा प्रेमी. त्याचे सतत प्रयत्न चालू असतात - सगळ्याना सांभाळण्याचे, उज्ज्वलाबद्दल त्याला वाटणाऱ्या आकर्षणापासून स्वत:ला व स्वत:च्या मैत्रीला वाचवण्याचे. असं आकर्षण जे कधी मैत्री वाटतं, कधी जिव्हाळा, कधी ममता  तर कधी निव्वळ शारीर वासना.

शेवटी काय होतं ? आयवा मारू परत नवीन होते ? समुद्रावर उसळलेलं वादळ आणि बोटीवरील सर्वांच्या मनातील भावनिक वादळ या दोन्ही वादळांचा शेवट काय होतो?

प्रथमपुरूषी कथनातून लेखक अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीने ही कथा पुढे नेतो. कथा दोस्तीची, प्रेमाची, खलाशांच्या जिंदादिलीची, प्रेमाची, वासनेची, द्वेषाची, मत्सराची, गूढतेची, धाडसाची, भावनिक आंदोलनाची, मानवी मनाच्या अनाकलनीयतेची आणि समुद्राची व खलाशांच्या जिद्दीची.

खलाशांचे मस्करीचे प्रसंग,  बोटीवरील पार्टीचे प्रसंग, अनंत उज्ज्वलामधील संभाषणे, उज्ज्वलाचा भूतकाळ कथनाचा प्रसंग, दीपकची अवघड व अनाकलनीय मानसिकता, काही कामोत्तेजक प्रसंग, अॅना व मिसेस सेनगुप्ता यांच्या बोटीवरील छोट्या भेटीचे प्रसंग , कॅप्टन रॉसच्या शिस्तीचे, अनुभवी नैपुण्याचे दर्शन घडवणारे प्रसंग, वादळाची रौद्र भीषणता, प्रत्येक प्रसंगात  घडणारं मानवी मनाचं नग्न वास्तववादी दर्शन आणि या साऱ्याचा चित्तथरारक शेवट या सगळ्या मधून लेखक एका वेगळ्या आधुनिक आणि धीट लेखनशैलीचं दर्शन घडवत आपल्याला शेवटपर्यंत बांधून ठेवतो.

आणि या सगळ्याच्या मूळाशी एक अंत:प्रवाह -

जहाज लाकडी असू दे; नाहीतर लोखंडी. दर्या जेव्हा आभाळ झोडपू लागतो तेव्हा सागराला आव्हान देणाऱ्या मानवाला दोन हातांनीच झगडावे लागते त्या बेलगाम निसर्गाशी.
एकदा किनारा सोडला की क्षितीजाच्या अतूट वलयात साथीला उरतो फक्त सागर. कधी शांत तर कधी अवखळ. कधी तळहातावर तोलून नेतो तर कधी उचलून आभाळात भिरकावतो. का? कधी? विज्ञानी गणितांत ह्याचे उत्तर कुठेच नसते. असतात बिनचूक चुकणारे आडाखे. चुकून बरोबर येणाऱ्याआडाख्यांवरून आखलेले.

निसर्गाच्या अप्रूपात हरवलेले खलाशी आजही या अज्ञाताला सामोरे जातात. बेलगाम महाभूताच्या ह्या जीवघेण्या खेळात हट्टाने सहभागी होतात. कधी काही मातीची माणसे उघड्या सागरावर स्पष्ट दिसणाऱ्या नग्न सत्यांनी दुभंगतात, हादरतात, बावरतात, निर्माण होणाऱ्या व्यामोहात भिरभिरतात. पण काही सागरपुत्र या अवखळ महाभूतांवरही मांड ठोकतात.  कोसळणाऱ्या आभळाची, उसळणाऱ्या समुद्राची तमा न बाळगता पायाखाली तरंगणाऱ्या निर्जीव पोलादाला वेठीला धरून सागराला वठणीवर आणतात. खांद्याला खांदे लाऊन उभे राहिलेले खलाशी झेपावणाऱ्या लाटेलाही थोपवणारी मानसिक निर्धाराची भिंत उभी करतात. अपुऱ्या पडणाऱ्या निर्जीव पोलादी भित्ताडालासुद्धा मानवी मनाची झिंग पाजतात. त्या तरंगत्या लोखंडी  पिंजऱ्यात स्वत:चे रक्त, मांस, जान ओतत एक प्रचंड पोलादी चेतना जिवंत करतात. कधी जिंकतात. कधी हरतात. पण परत परत लढतात. अज्ञाताच्या अंधारात चाचपडत कोसळणारे आभाळ तोलत रक्तामांसाचे खलाशी ह्या बेगुमान सागरावर आजही राज्य करतात.

मात्र जहाजाला लाडिक स्त्रीत्व बहाल करणाऱ्या शतकानुशतकांच्या पुराण्या सागरी परंपरेने रुढ केलेल्या स्पष्ट आदेशाला झुगारुन जर एखाद्या स्त्रीने जहाजावर सहप्रवासासाठी पाऊलही ठेवले तर सवतीमत्सरामुळे जहाजावर उठणाऱ्या पुढील भयंकर वादळाच्या चाहूलीने मुरलेले खलाशी आजही हादरतात.

कारण ही त्यांच्याच रक्तामांसाच्या आहुतीने जिवंत झालेली बोटीची पोलादी चेतना सवतीमत्सरानी पेटून उठून त्या स्त्रीच्या आडून उघड्या सागरावर कोणते जीवघेणे खेळ खेळेल ह्याची त्यांना शाश्वती नसते. त्या उत्पाती व्यामोहाच्या निर्माण होणाच्या कल्पनेनी ते थरकतात.

पण हे खरंच असं असतं ? आयवा मारू मिसेस उज्ज्वला उपाध्यायच्या आडून काय खेळ खेळते ? त्या खेळात शेवटी काय होतं ? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी वाचायला हवी - आयवा मारू.

-------- © मनिष मोहिले

Friday, November 13, 2015

ओढ

अशी ओढ आहे तुझी लागली
मला मी न माझा आता भेटतो

जरी दर्पणापुढे या, ऊभा मी असे
मला मी न दिसता, तुझीच प्रतिमा दिसे

सर पावसाची येता, मृद्गंध धुंद दरवळे
दरवळामध्ये त्या परि मी, तुला शोधतो

लखलखत्या तारकांनी,  हे गगन उजळले
त्या लाखोंमध्ये मजला,  तव मुखडा दिसे

मावळतीच्या किनाऱ्याचे, अद्भुत रंग ते
गगन फलकावरी, तुझेच मी गं चित्र काढतो

पहाटे थंड समीर, अंगी शहारा फुलवे
थंड समीरा परी त्या, मी तुला बिलगतो

अशी ओढ आहे तुझी लागली
मला मी न माझा आता भेटतो

---------- मनिष मोहिले

थोडासा रुमानी हो जाये

थोडासा रुमानी हो जाये -  नावातच काव्यमयता असलेला हा चित्रपट, चित्रपट माध्यमातून पडद्यावर साकारलेली एक मूर्तिमंत कविता आहे.

रुमानी म्हणजे romantic - प्रणयरम्य. चला थोडे प्रेमात पडू या , प्रणयरम्य होऊया असं सांगणारा हा चित्रपट.

१९९० साली प्रदर्शित झालेला अमोल पालेकर दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे एक सुरेख रुपक आहे.

एक छोटं गाव जिथे बरेचदा दुष्काळी परिस्थिती असते. अशा त्या गावात एक कुटुंब रहात असतं - कलेक्टर जयदीप दासगुप्ता (विक्रम गोखले), त्याचे दोन मुलगे (मोठा दिलीप कुळकर्णी)  आणि एक मुलगी बिन्नी (अनिता कंवर).

ही बिन्नी मुलगी असून सुद्धा तिच्या दिसण्यात व एकंदर व्यक्तिमत्वात स्त्री सुलभता फारच कमी असते. त्यामुळे स्वत:च्याच विश्वात ती रहात असते. वडीलांचा जरी तिला पाठींबा असला तरी एकंदरीतच घरातील सगळेच जण (आणि विशेष करून प्रेमळ पण अतिशय वास्तववादी विचार करणारा मोठा भाऊ)  तिला सतत एक मुलगी म्हणून तिनं कसं असलं पाहीजे, कसं दिसलं पाहीजे, कसं वागलं पाहीजे याबद्दल सतत उपदेशाचे डोस पाजत असतात. सतत होणाऱ्या या भडीमारामुळे आपलं मी पण आणि लोकांना अपेक्षित रुप यातील विसंगतीमुळे बिन्नी हळूहळू रुक्ष बनत चाललेली असते. या सगळ्या ताण तणावामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात एक ऊजाडपणा भरुन राहीलेला असतो. अगदी तसाच रुक्ष आणि ऊजाड जसा तो पावसाविनाचा परिसर.

आणि अशा वेळी तिथे येतो नटवरलाल उर्फ धृष्टद्युम्न पद्मनाभ प्रजापती नीळकंठ धूमकेतू बारीशकर. तो येतो एक नवीन स्वप्न एक नवीन आशा घेऊन - त्या दुष्काळग्रस्त भागात पाच हजार रुपयांच्या बदल्यात पाऊस पाडण्याचे आश्वासन घेऊन.

हां मेरे दोस्त, वही बारिश,
वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों मैं गाती है
पहाड़ों से फिसलती है, नदियों मैं चलती है
नहरों मैं मचलती है, कुंए पोखर से मिलती है
खप्रेलो पर गिरती है, गलियों मैं फिरती है
मोड़ पर संभालती है, फिर आगे निकलती है
वही बारिश

ये बारिश अक्सर गीली होती है
इसे पानी भी कहते हैं
उर्दू में आप, मराठी में पानी,तमिळ में कन्नी,
कन्नड़ में नीर, बंगला में… जोल केह्ते हैं
संस्‍कृत में जिसे वारि नीर जीवन पै अमृत पै अम्बु भी केह्ते हैं ! ग्रीक में इसे aqua pura, अंग्रेजी में इसे water,  फ्रेंच में औ’,  और केमिस्ट्री में H2O केह्ते हैं !

ये पानी आंखों से ढलता है तो आंसू कहलता है  लेकिन चेहरे पर चढ़ जाये तो रुबाब बन जाता है !  हां…कोई शर्म से पानी पानी हो जाता है और कभी कभी यह पानी सरकारी फाइलों में अपने कुंए समेत चोरी हो जाता है

पानी तो पानी है पानी जिन्दगानी है
इसलिए जब रूह की नदी सूखी हो
और मन का हिरण प्यासा हो
दीमाग में लगी हो आग
और प्यार की घागर खाली हो

तब मैं….हमेशा
ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूं
मेरी मानिए तो ये बारिश खरीदिये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश
सिर्फ 5 हज़ार रुपये में
इस्से कम में दे कोई तो चोर की सज़ा वो  मेरी
आपकी जूती सिर पर मेरी
मेरी बारिश खरीदये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश

 इकोनॉमिक्‍स का एक सिद्धांत है कि मांग ज्‍यादा हो और आपूर्ति कम हो तो चीजें अपने आप महंगी हो जाती हैं. फिर भी इस महंगाई में बारिश सिर्फ पांच हजार रुपये में! चौंकिये मत ये कीमत हौसले की है, उम्‍मीद की है, जिस पर दुनिया कायम है...

या "sales talk" मधून सर्वाना माहीत असलेल्या पावसाचं साध्या शब्दातून एक सुरेख काव्यमय चित्र बारीशकर उभं करतो.

आत्तापर्यंतच्या निराशेनी भरलेल्या,  रुक्षपणाची, दुष्काळाची सवय झाल्याप्रमाणे असलेल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक नव्या आशेची थंड झुळूक येते - पावसाच्या आधी जशी ओलसर थंड झुळूक येते तशी आणि बऱ्याच काळानंतर सगळ्याना एक सुखद ओलावा जाणवतो.

पावसाच्या आधी पडणाऱ्या गर्मीप्रमाणेच आयुष्यात देखील अडचणी येतात पण शेवटी पाऊस येणार आहे या आशेवरच आपण ऊन्हाळा सहन करतो त्या प्रमाणे या कठीण परिस्थितीला तोंड द्यायचं असतं. आयुष्यात देखील हवाहवासा पाऊस येतोच.

बारीशकर परिस्थिती बदलत नाही, दृष्टीकोन बदलतो - आहे त्याच परिस्थितीकडे सकारात्मक व आशावादी बनून बघण्याचा दृष्टीकोन बहाल करतो.

तो म्हणतो दोन रात्रींच्या मध्ये एक दिवस नाही तर दोन दिवसांच्या मध्ये एक रात्र असते. आज आणि उद्या दोन्ही तुमचे आहेत. आयुष्यात जे हवं ते बना.

दोन किनाऱ्यांच्या मधून एक छोटीशी धारा वाहते पाण्याची. कितीही छोटी असली तरी ती वाहती असते. किनारे जागच्या जागीच असतात. वाहती धारा समुद्राला जाऊन मिळते आणि समुद्राला घाट नसतात.

एकेका संवादातून एक एक अर्थपूर्ण आशावादी कविता आपल्यासमोर उभी रहाते - कमलेश पांडेच्या चतुरस्त्र लेखणीतून.
हाच आशावाद, हाच सकारात्मक दृष्टीकोन बारीशकर बिन्नीला देतो. तिला सांगतो - जगाच्या चष्म्यातून स्वत:ला बघू नकोस. स्वत:च्य नजरेतून स्वत:कडे बघ आणि जशी आहेस तशी स्वत:ला स्वीकार. आशावादी बन. स्वप्न बघ. स्वत:वर विश्वास ठेव आणि मग बघ फरक. तुझ्या रुक्ष बनलेल्या स्व वर हा आशेचा, स्वप्नांचा, विश्वासाचा पाऊस पडून दे. भीज त्यात मनसोक्त्त. त्यातल्या थेंबांप्रमाणे थुई थुई नाचून दे तुझं मन. त्याच्या ओघोळासारखं वाहून दे स्वत:ला स्वच्छंद. त्यातल्या ओलसर गारव्याच्या  सुखद अनुभवाची कडकडून गळाभेट घे आणि मग बघ तुला जग सुंदर झालेलं दिसेल कारण तुझ्या नजरेत तू स्वत: सुंदर झाली असशील. प्रेमात पड स्वत:च्या आणि रोमॅंटीक होऊन जा. प्रणयरम्य हो आणि प्रणयाच्या कल्पनेतली रम्यता अनुभव.

असह्य उन्हाळ्यानंतर आलेल्या पावसात चिंब भिजून ही धरती जशी स्वत:तला रुक्षपणा विसरुन मोहरते, गंधाळते, फुलून येते आणि जगाला तो मृद्गंध देते , हिरवळीनी सुखावते तशी तू जगाला मुग्धावशील कारण तू स्वत:वर प्रेम करशील.

शेवटी बारीशकरच्या प्रयत्नांना यश येतं. त्या दुष्काळग्रस्त भागातील लोकांच्या मनात जाग्या झालेल्या आशावादाचा विजय होतो आणि तिथे पाऊस पडून ती तहानेली धरती ओलेती होते, वरुणाच्या वर्षावात चिंब भिजते आणि तिची तिला जणू नवीन ओळख होते. तशीच ओळख होते बिन्नीला स्वत:ची बारीशकर नी आणलेल्या आशेच्या पावसामुळे. ती पण आतून फुलून येते आणि स्वत:चं अंतस्थ सौंदर्य तिला दिसतं आणि त्याच बरोबर तिच्या घरच्याना. अशी ही नवी नवेली बिन्नी स्वत:च्या प्रेमात पडते आणि चित्रपट संपतो.

ही सगळी काव्यात्मकता चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर साकार करण्यात लेखक कमलेश पांडे, दिग्दर्शक अमोल पालेकर आणि सर्वच कलाकार कमाल कमाल करतात.

विक्रम गोखले, दिलीप कुळकर्णीसहीत सर्वांचीच कामं अफलातून सुंदर आणि सहज. पण आपल्याला आठवत रहातात दोनच व्यक्ती - बारीशकर आणि बिन्नी. बारीशकरच्या भूमिकेत नानाची एंट्री उशिरा होते थोडी पण जिथे होते तिथून नाना छा जाता है. अफलातून मुद्राभिनय, संवादफेक आणि आवाजातील चढ उतारांच्या जोरावर नाना मूर्तिमंत आशावाद बनून आपल्या समोर येतो.  आयुष्यातील सकारात्मकतेवर आशावादावर श्रद्धा असलेली माणसं वेगळीच सुंदर वाटतात तसा नानाचा बारीशकर वाटतो आणि ह्याचा पुरावा देतात त्याचे " आयुष्यानी " भरलेले डोळे. Nana is simply awsome, fabulous
amazing & unbelievably believable as Barishkar.

आणि त्याच्या बारीशकरला तेव्हढ्याच ताकदीनी साथ देते अनिता कंवरची बिन्नी. सुरूवातीची स्वत:च्या कोषात स्वत:ला बंद करणारी, स्वत:चं मूळ व्यक्तिमत्व आणि जगाला अपेक्षित बिन्नी यातील विसंगती, सतत हे असं कर, तसं वागू नकोस म्हणून मिळणारा उपदेश वजा सल्ल्यांचा भडीमार यातून गोंधळून जाऊन रुक्ष बनलेली बिन्नी आणि बारीशकर आल्यानंतर सकारात्मक व आशावादी बनणारी बिन्नी हा प्रवास व त्यातील भावनिक आंदोलनं तिनी कमालीच्या ताकदीनी साकारली आहेत. अखेरीस मनाच्या रुक्ष भूमीला आशावाद, सकारात्मकता याच्या पावसात चिंब भिजून स्वत:ची नवीन ओळख झालेल्या बिन्नीला जगातलं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं स्वत:तलं सौंदर्य दिसतं आणि ती स्वत:च्याच प्रेमात पडून रोमॅंटीक होते - रुमानी होते आणि चक्क सुंदर दिसते - प्रेक्षकांना सुद्धा. त्या शेवटच्या प्रसंगात अनिता कंवरच्या सर्व साधारण चेहेऱ्यातलं सौंदर्य त्या रुपेरी पडद्यामधून आपल्याला दिसतं आणि भावतं यात एक कलाकार म्हणून अनिताचं जेव्हढं कौतुक आणि कर्तृत्व आहे तेव्हढीच कमाल आहे दिग्दर्शक अमोल पालेकरची. संपूर्ण अडीच तास हा म्हटलं तर नीरस वाटणारा विषय इतक्या तरल काव्यमय पद्धतीनी हाताळायचा आणि सगळा माहौल एव्हढा रुमानी करायचा की बिन्नीचं अंतस्थ सौंदर्य सर्वांसाठी दृष्यमान व्हावं ही अमोल पालेकरच्या दिग्दर्शनाची कमाल.

चित्रपट संपता संपता एक भारावले पणा येऊन  माझे  डोळे पाणावले होते - त्याच पाण्यानी जे पावसात पण असतं -  खरच कितीही जरी अडचणी असल्या तरी  जीवन किती सुंदर आहे , आशेनी नवसर्जनानी उत्फुल्ल आहे ह्या जाणीवेतून आलेला तो पाणावलेपणा आणि मनात वाजणारं ते एक गाणं -

मुश्कील हैं जीना, उम्मीदके बिना
आओ कुछ सपने सजाये
थोडासा रुमानी हो जाये !

-------- मनिष मोहिले

Tuesday, November 10, 2015

Unstoppable

एका सत्य घटनेवर आधारित एक उत्कृष्ट थरारपट. इंग्रजीत ज्याला on the edge of your seat म्हणतात अशा प्रकारात मोडणारा.

Fuller Pennsylvania मधील एका रेल्वेयार्डात Dewey नावाच्या एका मोटरमन च्या हलगर्जीपणामुळे इंजीन नं 777 आपल्या सामान लादलेल्या बोगींसहीत बिना मोटरमन रेल्वे ट्रॅकवर चालू लागते.  यार्डमास्टर Connie Hooper च्या हे लक्षात येताच ती Dewey आणि Chief welder Ned च्या मदतीने ते  इंजीन काबूत आणण्याचा प्रयत्न करते पण पूर्ण शक्तीनिशी (on full power) धावणाऱ्या त्या इंजीनपुढे ते व्यर्थ ठरतात.  आता ही बेलगाम गाडी थांबवता आली नाही तर Stanton या तिचा शेवटचा स्टॉप असलेल्या दाट लोकसंख्येच्या शहरात जाऊन मोठा अपघात होणार आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणार हे कळून येतं. कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर Connie स्थानिक पोलीस व इतर संबंधित अधिकाऱ्यांना संभाव्य धोक्याची कल्पना देते. त्याचवेळी ती आपल्या वरीष्ठाला Galvin ला देखील घडल्या प्रकाराची कल्पना देते.

सर्व गोष्टींचा आढावा घेताना हे लक्षात येते की या बिना मोटरमन चालणाऱ्या गाडीत आठ डब्यात अतिशय स्फोटक ज्वलनशील पदार्थ आहे आणि त्यामुळे संभाव्य  धोक्याची तीव्रता कैक पटीनी वाढते. गाडी बिना लोकवस्तीच्या प्रदेशातून जात असता derail करायची कल्पना Connie Galvin पुढे मांडते. पण मालाच्या नुकसानाच्या भितीने आणि नफेखोर मालकाची हाजी करणारा Galvin गाडी थांबवण्याची एक अशक्य योजना आखतो. दोन इंजीन या गाडीच्या पुढे आणून त्यांच्या ब्रेकच्या सहाय्याने या गाडीचा वेग कमी करायचा आणि तेवढ्या वेळात सैन्यातून निवृत्त होऊन रेल्वेत काम करणाऱ्या Marine नी इंजीनचा ताबा घ्यायचा. या प्रयत्नात सर्व डब्यांसहीत पूर्ण शक्तीनिशी धावणारी गाडी त्या दोन इंजीनना उडवून लावते आणि त्यांचा अनुभवी मोटरमन मृत्यूमुखी पडतो आणि स्फोटाच्या धक्क्यानी Marine गंभीररित्या जखमी होतो. आत्तापर्यंत सर्व प्रसारमाध्यमांत ही बातमी पसरुन या घटनेला live coverage मिळालेलं असतं.
ताण तणाव वाढतात.

या सगळ्या भानगडी चालू असताना Frank Barnes हा अतिशय अनुभवी मोटरमन आणि त्याचा तरुण अननुभवी सहकारी Will Colson हे दोघे 777 च्याच लोहमार्गावर विरुद्ध दिशेनी आपली गाडी नं 1206 घेउुन येत असतात. सर्व घडामोडींवर सतत लक्ष ठेवून असलेली Connie योग्य वेळी 1206 ला सायडींगला घेते ज्यामुळे दोन गाड्यांची टक्कर थोडक्यात टळते.

यात अनुभवी फ्रॅंक च्या लक्षात येतं की 777 च्या शेवटच्या बोगीचा कपलर ओपन आहे जिथे दुसरं इंजीन जोडलं जाऊ शकतं आणि जर तसं करुन त्या इंजीनचे ब्रेक्स अप्लाय केले तर कदाचित ७७७ ला थांबवता येइल. आणि मग ते आपल्या गाडीचं इंजीन नं 1206  सुट्टं करुन 777 ला पकडायला निघतात आणि पकडतात सुद्धा. 777 चा स्पीड थोडासा कमी करण्यात त्यांना यश येतं आणि त्यामुळेच एक अत्यंत घातकी वळण ते निर्विघ्नपणे पार करु शकतात. त्यात फ्रॅंकच्या अनुभवाचा सिंहाचा वाटा असतो.

पण 777 च्या वेगाला पूर्णतया काबू करणं त्याना जमत नाही. मग एवढा आटापिटा करुन केलेल्या मेहनतीला शेवटी यश मिळतं की अपयशच पत्करावं लागतं ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी चित्रपट पहायला हवा.

या चित्रपटाचा मुख्य नायक आहे यातला खिळवून ठेवणारा थरार आणि अतिशय घट्ट बांधून ठेवणारी पटकथा. संपूर्ण दीड तास आपण खुर्चीला खिळून पडद्यावरचे डोळे न हटवता चित्रपटात गुंगून जातो.

या पटकथेला योग्य न्याय देतात यातील अभिनेते. Frank Barnes च्या भूमिकेतला Denzel Washington, त्याचा सहकारी Will Colson बनलेला Chris Pine, Rossario Dawson ची Connie Hooper - प्रमुख भूमिका निभावणाऱ्या या तीनही कलाकारांची कामं लाजवाब.  एकाच वेळी अनेक आघाड्या सांभाळताना अनेक निर्णय चटचट घेणारी Connie, Rossario Dawson नी अफलातून साकारलीये.  Chris Pine चा वैयक्तिक कौटुंबिक अडचणीत अडकलेला पण धाडशी व कर्तव्यदक्ष Will Colson पण अप्रतिम. आणि Frank Barnes च्या भूमिकेत Denzel Washington निव्वळ लाजवाब. स्वत:च्या कामातील नैपुण्य, अनुभव आणि त्यामुळे आलेला आत्मविश्वास, जीवनाबद्दलचा त्याचा अनुभव आणि एवढ्या कठीण प्रसंगात डोकं शांत ठेउन योग्य निर्णय घेणारा व ते अंमलात आणणारा फ्रॅंक बार्न्स, डेंझेल वॉशिंटननी पडद्यावर जिवंत केलाय. इतर सहाय्यक अभिनेत्यांची कामे देखील सुरेख.

थरारपटामध्ये अत्यंत महत्वाचे असलेले छायाचित्रण व ध्वनीमुद्रण आणि ध्वनी संयोजन व परिणाम उत्कृष्ट. Casting थोडक्यात कलाकार निवड अगदी अचूक.

आणि दिग्दर्शक Tony Scott चं दिग्दर्शन. चित्रपटातील थरार कायम ठेवताना, त्याच्या वेगात अडथळा येउन न देता, समांतर पातळीवर स्कॉट आपल्याला दर्शन घडवतो Will Colson च्या पत्नीबरोबरच्या भावनिक घालमेलीचं, पत्नीच्या मृत्यूनंतर आपल्या दोन तरुण मुलीन्मधेच जग सामावलेला आणि रेल्वे कंपनीच्या धोरणांमुळे मुदतपूर्व निवृत्ती लादला गेलेल्या फ्रॅंकच्या मनातील आंदोलने, एखादी घटना घडत असता जनतेला, प्रसारमाध्यमाना त्या नाट्यातील मंचावरचे कलाकार दिसतात फ्रॅंक व विल सारखे. पण पडद्यामागे कोनी सारखं कोणीतरी अथक प्रयत्न व तेही अनेक आघाड्यांवर काम करत असतं - या सगळ्या गोष्टी दिग्दर्शकानी फार उत्कृष्ट पणे दाखवल्यायत. ( आपल्या कडचं असं एक उदाहरण म्हणजे A Wednesday मधल्या कमिश्नर अनुपम खेरचे दाखवलेले प्रयत्न).  हे सगळं करताना टोनी स्कॉट सतत आपली उत्कंठा वाढवत रहातो त्याच्या हाताळणीतून.

A perfect mixture of on the edge of your seat kind of thrill, drama, behind the scene activities &  family emotions. Its an amazing cinematic experience - this movie.
एक असा चित्रपट जो आधी बहितला असल्यामुळे शेवट माहीत असला तरी त्याच्या उत्कंठा वाढवणाऱ्या हाताळणीमुळे जिथून बघायला सुरू करु तिथून शेवटपर्यंत बसायला लावणारा.

Once the movie starts rolling in front of your eyes, no matter from where you start watching, this movie itself is simply  "Unstoppable" .

------ मनिष मोहिले 

Friday, November 6, 2015

दोष

माझ्या खुळ्या दिलाचा काहीच दोष नव्हता
हसलीस मुग्ध तू नी, दिलाचा बोलबाला

तू चांदणफुली जणू गं, रातराणी गंधमदनिका
शोधात सुंगंधाच्या, मज झाली चांदणबाधा

केस तुझे कुरळे गं, सळसळले नागीणीसम ते
गंधित विळख्यात धुंद, मन बेहोष झाले माझे

तव नेत्र भावभरले, जणू डोह खोल प्रीतीचा
अन थांग लावताना, मी चिंब चिंब भिजलेला

तुझ्या मेहंदीचा गं रंग सुगंधानी रंगलेला
माझ्या तळव्यामध्ये ग तुझा मुखडा हसला

-------- मनिष मोहिले
@manishmohile.blogspot.com