इजाजत
१९८७ साली इजाजत प्रदर्शित झाला तेव्हा मी दहावीत होतो. चित्रपटाचे कथानक, हाताळणी, दिग्दर्शन, काव्यमयता आणि अर्थ; पूर्णपणे समजण्याचं ते वय नव्हतं. इजाजत एक वेगळी प्रगल्भ प्रेमकथा आहे इतकच कळलं होतं. पंचमची गाणी मात्र तेव्हासुद्धा प्रचंड आवडली होती.
नंतर बरेचदा इजाजत तुकड्या तुकड्यात पाहिला. इजाजतच्या गाण्यांची तर अनंत श्रवण-पारायणं केली. वाढत्या वयाबरोबर गुलझारचे भारून टाकणारे शब्द, आशाचा जादुई आवाज आणि पंचमचं अद्भुत संगीत दरवेळी काही नवीन जाणीव करून देत गेले. आणि; परवा असाच एकदा इजाजत परत बघितला.
एका अनाम स्टेशनच्या वेटींग रूम मध्ये पावसाळी रात्री अचानक समोर आलेल्या महेंद्र आणि सुधाच्या भेटीतून सुरू होणारा इजाजत.
महेंद्र आणि सुधाचं लग्न त्यांच्या घरच्यांनी जमवून ठेवलेलं असतं. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या निकट परीचयाची असतात. त्यामुळे महेंद्र सेटल होइपर्यंत घरचे आणि सुधा विश्वासाने थांबलेले असतात. पण महेंद्र मधेच मायाच्या मोहपाशात अडकतो. योग्य कृतीचच समर्थन करणाऱ्या बडिलाना लग्नाच्या या तिढ्याच्या बाबतीत तोंड कसं द्यायचं म्हणून महेंद्र गोंधळतो. पण ह्या बाबतीत सुधाशीच बोलायचं ठरवून तो हातचं काही राखून न ठेवता तिला खरं ते सर्व सांगतो. सुधादेखील प्रगल्भ व्यक्तिमत्वाची साक्ष देत महेंद्रला सल्ला देते - जो सच हैं और सही हैं वही करो. त्यामुळे मायाच्या अचानक निघून जाण्याने जेव्हा महेंद्र सुधाशी लग्न करण्याचा निर्णय घेतो तेव्हा झालेलं लग्न ही एकप्रकारची तडजोड असली तरी त्यात गुप्तता वा लपवाछपवी नसते. सत्य स्विकारून निर्णय घेण्यातील सामंजस्य असतं. हे सामंजस्य; महेंद्र व सुधाच्या दांपत्य जीवनातील भावविश्वात, अप्रत्यक्षपणे सतत जाणवत रहाणाऱ्या मायाच्या अस्तित्वाला; दोघेही वैयक्तिकरित्या व एक दांपत्य म्हणून; ज्या पद्धतीने हाताळतात त्या प्रसंगातून दिसून येतं. गुलझार मधला दिग्दर्शक इथे जाणवतो. मात्र ज्या क्षणी महेंद्र मायाचा आत्महत्येचा प्रयत्न सुधापासून लपवून ठेवायचा प्रयत्न करतो त्या क्षणी गैरसमज सुरू होतात. सुधा महेंद्रला सोडून निघून जाते. हृदयविकाराच्या झटक्यातून महेंद्रला सावरायला माया मदत करते. जणू नकळत केलेल्या चुकीचं परिमार्जन ती करत असते. पण त्यानंतर पुन्हा एकदा दैववशात् माया महेंद्रला पुन्हा दुरावते - यावेळी कायमची. नंतर आयुष्याच्या एका अकल्पित वळणावर महेंद्र व सुधा भेटतात आणि सर्व खुलासा होतो. सत्य समजल्यानंतर आधी न सांगता महेंद्रला सोडून गेलेली व नवीन आयुष्यात स्थिरावलेली सुधा ह्यावेळी मात्र महेंद्रची इजाजत घेऊन आपल्या नव्या आयुष्याकडे वळते आणि चित्रपट संपतो.
हे कथानक तर सगळ्यानाच समजलेलं आहे. एक अतिशय वेगळी प्रेमकथा जी गुलझार नी फार प्रगल्भतेने हाताळली. त्याच्या दिग्दर्शनातील प्रगल्भता सुधा, महेंद्र व माया ह्या पात्रांच्या प्रगल्भ वागणूकीतून प्रेक्षकांना दिसून येते. अतिशय प्रगल्भ अशा ह्या प्रेमत्रिकोणाच्या कथेला गुलझारच्या लेखणीतून झरलेल्या मोजक्याच पण अर्थगर्भ गीतांनी एक तरल काव्यमयता लाभते. पंचमच्या अद्भुत संगीतानी आणि आशाच्या स्वर्गीय सुरातून एक आगळा माहौल बनतो. सगळं खरं. पण मग ह्यावेळी असं काय वेगळं जाणवलं मला ज्यामुळे हा लेखनप्रपंच मांडला ?
इजाजत मला ह्यावेळी प्रतीत झाला तो निव्वळ एक प्रगल्भ प्रेमत्रिकोण म्हणून नाही तर एक रुपक म्हणून प्रतीत झाला. कथेतील पात्रांची नावंच हे रुपक आपल्या समोर आणतात. माया हे जीवनातील मोहमयी मनस्वितेचं व सहजस्फूर्त वर्तणुकीचं रुपक आहे. सुधा हे बुद्धीचं - सुसंस्कृत सारासार विवेकबुद्धीचं रुपक आहे आणि महेंद्र हे सहजस्फूर्त मनस्विता व सारासार विवेकबुद्धी ह्या दोघींच्या मध्ये दोलायमान असलेल्या मनुष्याचं रुपक आहे.
महेंद्रला "जो सच हैं और सही हैं वही किजिए" असा सल्ला देणाऱ्या सुधानी; एकपरीने महेंद्रच्या आयुष्यातील तडजोडीच्या रुपात दुय्यम भूमिका स्विकारलेली असली, त्याच्या मनातील मायाबद्दलच्या भावना स्विकारलेल्या असल्या, तरी महेंद्रची पत्नी म्हणून मनात कडूपणा न बाळगता, दांपत्य जीवनाचा पाया असलेला प्रेमभाव जपण्याचा व जोजवण्याचा प्रयत्न करत ती हे नातं व दांपत्य जीवन प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करत असते.
महेंद्रच्या मनातील मायाचं स्थान अढळ आहे ही जाणीव असल्यामुळे, आपल्या वाटणीला महेंद्र तुकड्या तुकड्यातच येणार हे ती ओळखून आहे.
ह्या तुकड्या तुकड्यात लाभणाऱ्या महेंद्रमुळे ती तृप्त होत नाही, तहानेली रहातेय. त्याची जाणीव पण ती त्याला देते. पण त्याचबरोबर तिच्या वाटणीच्या महेंद्रमध्ये तिला पूर्ण भिजून जायचय. अतृप्त रहात भागेल तेव्हढी तहान भागवायची आहे. महेंद्रच्या मनातून मायाला जबरदस्ती काढण्याचा प्रयत्न केला तर तिघांच्या जीवनाचं डबकं होइल हे तिला नकोय . तिला त्यालाही प्रवाही ठेवायचं आहे अन् स्वत:लाही. म्हणून ती म्हणते कतरा कतरा मिलती हैं, कतरा कतरा जीने दो, जिंदगी हैं, बहने दो, प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो.
ह्या प्रयत्नात महेंद्रची देखील तिला प्रामाणिक साथ असते. पण तिच्या हक्काचं नातं, भावना ह्यात माया मिसळू पाहते आहे अशी जेव्हा तिची भावना होते त्याक्षणी तिच्यातील स्वाभिमानी स्वतंत्र वृत्तीची प्रगल्भ स्त्री बंड करून उठते आणि महेंद्रच्या आयुष्यातून ती निघून जाते. सारासार विवेकबुद्धीच इतक्या स्थिरचित्त प्रगल्भतेने विचार करू शकते आणि निर्णय घेऊ शकते. सुधाचं पात्र संपूर्ण कथेत सातत्याने ही नीरक्षीर विवेकाची प्रगल्भ विवेकबुद्धी दर्शवत रहाते. तिच्यातील संगीत तिच्या विचाराना व वागण्याला एक सुसंस्कृतपणाची जोड देतं.
मायाचं अस्तित्वच जीवनतील रसरसत्या जिवंतपणाचं प्रतीक आहे. त्यामुळे तिचं जगणं हे जीवनाला पूर्णपणे आलिंगून टाकणारं आणि हातातला क्षण भरभरून जगणारं आहे. पण त्याचबरोबर ती स्वाभाविकपणे तितकीच मनस्वी आणि अंत:प्रेरणेनुसार जगणारी आहे. त्यात पुढचा मागचा साधक बाधक विचार नाही. तिची ती प्रवृत्तीच नाही. हाती असलेला आत्ताचा क्षण भरभरून जगायचा हे तिचं तत्वज्ञान. तिची ही मनस्विता तिच्यातील कवयित्रीला फुलवत, अप्रतिम आणि काळजाला भिडणाऱ्या कविता जन्माला घालते आणि त्या जगते देखील.
रुकती हैं थमती हैं, कभी बरसती हैं, बादलपे पाँव रखे मचलती रहती हैं हे पावसाप्रमाणेच मायाच्यादेखील जीवनाचं गाणं आहे. आसमंत धुंद करणाऱ्या, सुंदर ताजा करणाऱ्या पावसासारखी ती आहे - अतर्क्य - नात्यात कधी ऊसळून येणार, कधी धो धो संततधार धरणार तर कधी रिमझिम रिमझिम भिजवत रहाणार आणि कधी न सांगताच गायब होणार. ती माया आहे - मोहमयी. तसं मोहमयी रहाणं हा तिचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच ती सर्वाना मोहवते. हवीहवीशी वाटते. पण तिची मनस्विता खऱ्या अर्थानी समजणं व सांभाळणं कोणालाच पूर्णपणे जमत नाही.
अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की तिला चांगल्या वाईटाची चाड नाही वा जाणीव नाही. तिला ह्याची चांगलीच जाण आहे म्हणूनच सुधा व महेंद्रच्या लग्नानंतर एका मनस्वी क्षणी ती लिहून जाते - मेरा कुछ सामाँ तुम्हारे पास पडा हैं, सावन के कुछ भिगे भिगे दिन रक्खे हैं ........ मेरा वह सामाँ लौटा दो .
अशा या मोहमयी मनस्वितेच्या आणि सारासार विवेकबुद्धीच्या मध्ये दोलायमान असलेल्या मनुष्याचं महेंद्र हे रुपक आहे. मात्र तो प्रामाणिक देखील आहे. समोरच्याला होता होइ तो न दुखवण्याचा प्रयत्न तो करतो. त्यामुळेच जणू त्याला आरसा दाखवणारे असे त्याचे वडील - त्यांच्याशी मायाबद्दल बोलायची वेळ येते तेव्हा तो गोंधळतो, डगमगतो आणि सुधाकडे जातो यातून मार्ग काढायला. ह्यात कोणी पलायनवाद सुद्धा शोधेल. पण त्याच्यात खोटेपणा वा अप्रामाणिकपणा जरासाही नाही ही त्याची जमेची बाजू आहे. सुधाच्या मन लावून संसार करण्याच्या प्रयत्नाला तो देखील त्याच्या परीने प्रामाणिक साथ देतो. पण मोहमयी मनस्वितेला नियंत्रित स्थान देण्याच्या प्रयत्नात तो सत्यकथन टाळतो तिथे सारासार विवेक बुद्धी त्याला प्रतिप्रश्न करते . तिथे तो संतापतो आणि त्याची व सुधाची - विवेकबुद्धीची ताटातूट होते. प्रत्येक क्षण भरभरून सहजस्फूर्त जगू पहाणारी मनस्विता आयुष्याच्या लांबलचक प्रवासात क्षणभंगुर ठरते. काही वेळा काही काळासाठी तर काही वेळा कायमसाठी. खाली हाथ शाम आयी हैं खाली हाथ जायेगी, आज भी ना आया कोई खाली लौट जायेगी हे खरं तर तिघांच्या बाबतीत खरं ठरतं
मनस्विता आणि विवेकबुद्धी ह्यांच्यामधील गैरसमजामुळे समंजस प्रेमाचा अंत होतो.
प्रेमत्रिकोणाच्या रेशमी भावबंधातून गुलझार हे रुपक आपल्यासमोर मांडतो. एका काव्यमय संगीतमय माध्यमातून. पण मग ह्यात चूक कोण ? बरोबर कोण ? चूक कुणाचीच नाही.
मायाची ? नाही. ती आहेच मनस्वी. विवेकी सुधाची ? नाही. महेंद्रची ? त्याची देखील नाही. मनुष्याला मनस्वितेचा मोह पडणं हे स्वाभाविक आहे. गरज आहे ती सत्याची आणि योग्य काय व अयोग्य काय ह्यातील तारतम्य बाळगायची आणि सत्य समजल्यावर सत्याला योग्य तो मान द्यायची. ती शेवटची इजाजत हा विवेकबुद्धीने सत्याचा केलेला सन्मान आहे.
जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या रुपातील मोहमयी मनस्विता मायाच्या रुपात भेटतच रहाणार. तिला टाळणं हा त्यावर उपाय नाही. काही क्षण मनस्वीपणे भरभरून जगले तर जीवन काव्यमय होतं. ते तसं मोरपंखी कवितेसारखं, बरसणाऱ्या पावसासारखं व्हावं सुद्धा. एकलेपणाची रिकामी संध्याकाळ कोणाच्याच वाट्याला येऊ द्यायची नसेल तर रोजच्या जगण्यासाठी विवेकबुद्धीच हवी. म्हणून मनस्वितेला जवळ करताना / भेटताना; सारासार विवेकबुद्धीची साथ मात्र हवी आणि त्यासाठी प्रामाणिकपणा आवश्यक आहे. जितक्या प्रामाणिकपणे मनस्वितेचा मोह होतो तितक्याच प्रामाणिकपणे जे सत्य व योग्य आहे ते निवडण्यासाठी विवेकबुद्धी जवळ हवी. मला प्रतीत झालेलं इजाजतमधलं हे रुपक.
शेवटी मनस्वितेचं काही सामान तिच्याबरोबरच्या समरसून भरभरून जगलेल्या क्षणांची साक्षखूण म्हणून मनाच्या एका अलवार कोपऱ्यात जपून ठेवलं तरी मागे राहिलेलं बाकीचं सामान विवेकबुद्धीने परत पाठवणं मनुष्याच्या आयुष्यात गरजेचं आहे.
---- मनिष मोहिले
१९८७ साली इजाजत प्रदर्शित झाला तेव्हा मी दहावीत होतो. चित्रपटाचे कथानक, हाताळणी, दिग्दर्शन, काव्यमयता आणि अर्थ; पूर्णपणे समजण्याचं ते वय नव्हतं. इजाजत एक वेगळी प्रगल्भ प्रेमकथा आहे इतकच कळलं होतं. पंचमची गाणी मात्र तेव्हासुद्धा प्रचंड आवडली होती.
नंतर बरेचदा इजाजत तुकड्या तुकड्यात पाहिला. इजाजतच्या गाण्यांची तर अनंत श्रवण-पारायणं केली. वाढत्या वयाबरोबर गुलझारचे भारून टाकणारे शब्द, आशाचा जादुई आवाज आणि पंचमचं अद्भुत संगीत दरवेळी काही नवीन जाणीव करून देत गेले. आणि; परवा असाच एकदा इजाजत परत बघितला.
एका अनाम स्टेशनच्या वेटींग रूम मध्ये पावसाळी रात्री अचानक समोर आलेल्या महेंद्र आणि सुधाच्या भेटीतून सुरू होणारा इजाजत.
महेंद्र आणि सुधाचं लग्न त्यांच्या घरच्यांनी जमवून ठेवलेलं असतं. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या निकट परीचयाची असतात. त्यामुळे महेंद्र सेटल होइपर्यंत घरचे आणि सुधा विश्वासाने थांबलेले असतात. पण महेंद्र मधेच मायाच्या मोहपाशात अडकतो. योग्य कृतीचच समर्थन करणाऱ्या बडिलाना लग्नाच्या या तिढ्याच्या बाबतीत तोंड कसं द्यायचं म्हणून महेंद्र गोंधळतो. पण ह्या बाबतीत सुधाशीच बोलायचं ठरवून तो हातचं काही राखून न ठेवता तिला खरं ते सर्व सांगतो. सुधादेखील प्रगल्भ व्यक्तिमत्वाची साक्ष देत महेंद्रला सल्ला देते - जो सच हैं और सही हैं वही करो. त्यामुळे मायाच्या अचानक निघून जाण्याने जेव्हा महेंद्र सुधाशी लग्न करण्याचा निर्णय घेतो तेव्हा झालेलं लग्न ही एकप्रकारची तडजोड असली तरी त्यात गुप्तता वा लपवाछपवी नसते. सत्य स्विकारून निर्णय घेण्यातील सामंजस्य असतं. हे सामंजस्य; महेंद्र व सुधाच्या दांपत्य जीवनातील भावविश्वात, अप्रत्यक्षपणे सतत जाणवत रहाणाऱ्या मायाच्या अस्तित्वाला; दोघेही वैयक्तिकरित्या व एक दांपत्य म्हणून; ज्या पद्धतीने हाताळतात त्या प्रसंगातून दिसून येतं. गुलझार मधला दिग्दर्शक इथे जाणवतो. मात्र ज्या क्षणी महेंद्र मायाचा आत्महत्येचा प्रयत्न सुधापासून लपवून ठेवायचा प्रयत्न करतो त्या क्षणी गैरसमज सुरू होतात. सुधा महेंद्रला सोडून निघून जाते. हृदयविकाराच्या झटक्यातून महेंद्रला सावरायला माया मदत करते. जणू नकळत केलेल्या चुकीचं परिमार्जन ती करत असते. पण त्यानंतर पुन्हा एकदा दैववशात् माया महेंद्रला पुन्हा दुरावते - यावेळी कायमची. नंतर आयुष्याच्या एका अकल्पित वळणावर महेंद्र व सुधा भेटतात आणि सर्व खुलासा होतो. सत्य समजल्यानंतर आधी न सांगता महेंद्रला सोडून गेलेली व नवीन आयुष्यात स्थिरावलेली सुधा ह्यावेळी मात्र महेंद्रची इजाजत घेऊन आपल्या नव्या आयुष्याकडे वळते आणि चित्रपट संपतो.
हे कथानक तर सगळ्यानाच समजलेलं आहे. एक अतिशय वेगळी प्रेमकथा जी गुलझार नी फार प्रगल्भतेने हाताळली. त्याच्या दिग्दर्शनातील प्रगल्भता सुधा, महेंद्र व माया ह्या पात्रांच्या प्रगल्भ वागणूकीतून प्रेक्षकांना दिसून येते. अतिशय प्रगल्भ अशा ह्या प्रेमत्रिकोणाच्या कथेला गुलझारच्या लेखणीतून झरलेल्या मोजक्याच पण अर्थगर्भ गीतांनी एक तरल काव्यमयता लाभते. पंचमच्या अद्भुत संगीतानी आणि आशाच्या स्वर्गीय सुरातून एक आगळा माहौल बनतो. सगळं खरं. पण मग ह्यावेळी असं काय वेगळं जाणवलं मला ज्यामुळे हा लेखनप्रपंच मांडला ?
इजाजत मला ह्यावेळी प्रतीत झाला तो निव्वळ एक प्रगल्भ प्रेमत्रिकोण म्हणून नाही तर एक रुपक म्हणून प्रतीत झाला. कथेतील पात्रांची नावंच हे रुपक आपल्या समोर आणतात. माया हे जीवनातील मोहमयी मनस्वितेचं व सहजस्फूर्त वर्तणुकीचं रुपक आहे. सुधा हे बुद्धीचं - सुसंस्कृत सारासार विवेकबुद्धीचं रुपक आहे आणि महेंद्र हे सहजस्फूर्त मनस्विता व सारासार विवेकबुद्धी ह्या दोघींच्या मध्ये दोलायमान असलेल्या मनुष्याचं रुपक आहे.
महेंद्रला "जो सच हैं और सही हैं वही किजिए" असा सल्ला देणाऱ्या सुधानी; एकपरीने महेंद्रच्या आयुष्यातील तडजोडीच्या रुपात दुय्यम भूमिका स्विकारलेली असली, त्याच्या मनातील मायाबद्दलच्या भावना स्विकारलेल्या असल्या, तरी महेंद्रची पत्नी म्हणून मनात कडूपणा न बाळगता, दांपत्य जीवनाचा पाया असलेला प्रेमभाव जपण्याचा व जोजवण्याचा प्रयत्न करत ती हे नातं व दांपत्य जीवन प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करत असते.
महेंद्रच्या मनातील मायाचं स्थान अढळ आहे ही जाणीव असल्यामुळे, आपल्या वाटणीला महेंद्र तुकड्या तुकड्यातच येणार हे ती ओळखून आहे.
ह्या तुकड्या तुकड्यात लाभणाऱ्या महेंद्रमुळे ती तृप्त होत नाही, तहानेली रहातेय. त्याची जाणीव पण ती त्याला देते. पण त्याचबरोबर तिच्या वाटणीच्या महेंद्रमध्ये तिला पूर्ण भिजून जायचय. अतृप्त रहात भागेल तेव्हढी तहान भागवायची आहे. महेंद्रच्या मनातून मायाला जबरदस्ती काढण्याचा प्रयत्न केला तर तिघांच्या जीवनाचं डबकं होइल हे तिला नकोय . तिला त्यालाही प्रवाही ठेवायचं आहे अन् स्वत:लाही. म्हणून ती म्हणते कतरा कतरा मिलती हैं, कतरा कतरा जीने दो, जिंदगी हैं, बहने दो, प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो.
ह्या प्रयत्नात महेंद्रची देखील तिला प्रामाणिक साथ असते. पण तिच्या हक्काचं नातं, भावना ह्यात माया मिसळू पाहते आहे अशी जेव्हा तिची भावना होते त्याक्षणी तिच्यातील स्वाभिमानी स्वतंत्र वृत्तीची प्रगल्भ स्त्री बंड करून उठते आणि महेंद्रच्या आयुष्यातून ती निघून जाते. सारासार विवेकबुद्धीच इतक्या स्थिरचित्त प्रगल्भतेने विचार करू शकते आणि निर्णय घेऊ शकते. सुधाचं पात्र संपूर्ण कथेत सातत्याने ही नीरक्षीर विवेकाची प्रगल्भ विवेकबुद्धी दर्शवत रहाते. तिच्यातील संगीत तिच्या विचाराना व वागण्याला एक सुसंस्कृतपणाची जोड देतं.
मायाचं अस्तित्वच जीवनतील रसरसत्या जिवंतपणाचं प्रतीक आहे. त्यामुळे तिचं जगणं हे जीवनाला पूर्णपणे आलिंगून टाकणारं आणि हातातला क्षण भरभरून जगणारं आहे. पण त्याचबरोबर ती स्वाभाविकपणे तितकीच मनस्वी आणि अंत:प्रेरणेनुसार जगणारी आहे. त्यात पुढचा मागचा साधक बाधक विचार नाही. तिची ती प्रवृत्तीच नाही. हाती असलेला आत्ताचा क्षण भरभरून जगायचा हे तिचं तत्वज्ञान. तिची ही मनस्विता तिच्यातील कवयित्रीला फुलवत, अप्रतिम आणि काळजाला भिडणाऱ्या कविता जन्माला घालते आणि त्या जगते देखील.
रुकती हैं थमती हैं, कभी बरसती हैं, बादलपे पाँव रखे मचलती रहती हैं हे पावसाप्रमाणेच मायाच्यादेखील जीवनाचं गाणं आहे. आसमंत धुंद करणाऱ्या, सुंदर ताजा करणाऱ्या पावसासारखी ती आहे - अतर्क्य - नात्यात कधी ऊसळून येणार, कधी धो धो संततधार धरणार तर कधी रिमझिम रिमझिम भिजवत रहाणार आणि कधी न सांगताच गायब होणार. ती माया आहे - मोहमयी. तसं मोहमयी रहाणं हा तिचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच ती सर्वाना मोहवते. हवीहवीशी वाटते. पण तिची मनस्विता खऱ्या अर्थानी समजणं व सांभाळणं कोणालाच पूर्णपणे जमत नाही.
अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की तिला चांगल्या वाईटाची चाड नाही वा जाणीव नाही. तिला ह्याची चांगलीच जाण आहे म्हणूनच सुधा व महेंद्रच्या लग्नानंतर एका मनस्वी क्षणी ती लिहून जाते - मेरा कुछ सामाँ तुम्हारे पास पडा हैं, सावन के कुछ भिगे भिगे दिन रक्खे हैं ........ मेरा वह सामाँ लौटा दो .
अशा या मोहमयी मनस्वितेच्या आणि सारासार विवेकबुद्धीच्या मध्ये दोलायमान असलेल्या मनुष्याचं महेंद्र हे रुपक आहे. मात्र तो प्रामाणिक देखील आहे. समोरच्याला होता होइ तो न दुखवण्याचा प्रयत्न तो करतो. त्यामुळेच जणू त्याला आरसा दाखवणारे असे त्याचे वडील - त्यांच्याशी मायाबद्दल बोलायची वेळ येते तेव्हा तो गोंधळतो, डगमगतो आणि सुधाकडे जातो यातून मार्ग काढायला. ह्यात कोणी पलायनवाद सुद्धा शोधेल. पण त्याच्यात खोटेपणा वा अप्रामाणिकपणा जरासाही नाही ही त्याची जमेची बाजू आहे. सुधाच्या मन लावून संसार करण्याच्या प्रयत्नाला तो देखील त्याच्या परीने प्रामाणिक साथ देतो. पण मोहमयी मनस्वितेला नियंत्रित स्थान देण्याच्या प्रयत्नात तो सत्यकथन टाळतो तिथे सारासार विवेक बुद्धी त्याला प्रतिप्रश्न करते . तिथे तो संतापतो आणि त्याची व सुधाची - विवेकबुद्धीची ताटातूट होते. प्रत्येक क्षण भरभरून सहजस्फूर्त जगू पहाणारी मनस्विता आयुष्याच्या लांबलचक प्रवासात क्षणभंगुर ठरते. काही वेळा काही काळासाठी तर काही वेळा कायमसाठी. खाली हाथ शाम आयी हैं खाली हाथ जायेगी, आज भी ना आया कोई खाली लौट जायेगी हे खरं तर तिघांच्या बाबतीत खरं ठरतं
मनस्विता आणि विवेकबुद्धी ह्यांच्यामधील गैरसमजामुळे समंजस प्रेमाचा अंत होतो.
प्रेमत्रिकोणाच्या रेशमी भावबंधातून गुलझार हे रुपक आपल्यासमोर मांडतो. एका काव्यमय संगीतमय माध्यमातून. पण मग ह्यात चूक कोण ? बरोबर कोण ? चूक कुणाचीच नाही.
मायाची ? नाही. ती आहेच मनस्वी. विवेकी सुधाची ? नाही. महेंद्रची ? त्याची देखील नाही. मनुष्याला मनस्वितेचा मोह पडणं हे स्वाभाविक आहे. गरज आहे ती सत्याची आणि योग्य काय व अयोग्य काय ह्यातील तारतम्य बाळगायची आणि सत्य समजल्यावर सत्याला योग्य तो मान द्यायची. ती शेवटची इजाजत हा विवेकबुद्धीने सत्याचा केलेला सन्मान आहे.
जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या रुपातील मोहमयी मनस्विता मायाच्या रुपात भेटतच रहाणार. तिला टाळणं हा त्यावर उपाय नाही. काही क्षण मनस्वीपणे भरभरून जगले तर जीवन काव्यमय होतं. ते तसं मोरपंखी कवितेसारखं, बरसणाऱ्या पावसासारखं व्हावं सुद्धा. एकलेपणाची रिकामी संध्याकाळ कोणाच्याच वाट्याला येऊ द्यायची नसेल तर रोजच्या जगण्यासाठी विवेकबुद्धीच हवी. म्हणून मनस्वितेला जवळ करताना / भेटताना; सारासार विवेकबुद्धीची साथ मात्र हवी आणि त्यासाठी प्रामाणिकपणा आवश्यक आहे. जितक्या प्रामाणिकपणे मनस्वितेचा मोह होतो तितक्याच प्रामाणिकपणे जे सत्य व योग्य आहे ते निवडण्यासाठी विवेकबुद्धी जवळ हवी. मला प्रतीत झालेलं इजाजतमधलं हे रुपक.
शेवटी मनस्वितेचं काही सामान तिच्याबरोबरच्या समरसून भरभरून जगलेल्या क्षणांची साक्षखूण म्हणून मनाच्या एका अलवार कोपऱ्यात जपून ठेवलं तरी मागे राहिलेलं बाकीचं सामान विवेकबुद्धीने परत पाठवणं मनुष्याच्या आयुष्यात गरजेचं आहे.
---- मनिष मोहिले
No comments:
Post a Comment