काही दिवस मनात घोळतय की गुलजार वरती परत एकदा काहीतरी लिहावं.
पण काय लिहावं ? कितीतरी जणांनी गुलजारवर; त्याच्या कवितेवर पुष्कळ काही लिहीलं आहे. त्यातील काही तर दादा मंडळी असतील.
अस्मादिकानी सुद्धा गुलजारवर एकदा लिहीण्याचं धाडस केलेलं आहे. त्या लेखात एक संवेदनशील, शब्दांवर अफाट पकड व प्रभुत्व असलेला, अत्यंत अभिनव कल्पनाशक्तीचं आपल्या कवितातून दर्शन घडवणारा कवी, एक प्रथितयश गीतकार, दिग्दर्शक, कथा व पटकथा लेखक अशा त्याच्या विविध पैलूंबद्दल व त्या क्षेत्रातील त्याच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल मी लिहीलं होतं. त्याच्या कविता / गाणी / चित्रपट ह्यातील हाताळल्या गेलेल्या विषयांच्या आवाक्याबद्दल व विविधतेबद्दल लिहीलं होतं. आता अजून वेगळं काय लिहायचं ?
शेवटी ठरवलं की समग्र गुलजार असा विषय परत हाताळण्याऐवजी गुलजारच्या असंख्य गीतांपैकी अतिशय आवडणारं एखादं गीत निवडून त्याबद्दल लिहायचं.
हा विचार नक्की झाल्यावर मग पुढचा विचार ! कोणतं गाणं निवडावं? हा विचार करताना राहून राहून एक गाणं माझ्या मनात येत होतं.
गुलजार, आर डी व आशा या संगीतक्षेत्रातील दिग्गज त्रयीचा चित्रपटेतर गाण्यांचा एक संग्रह आहे - दिल पडोसी है !
त्यातील सातों बार बोले बंसी.
गुलजारच्या असंख्य आवडत्या गीतांपैकी माझ्या अतिशय आवडीचं, अतिशय जवळचं असं हे गीत.
बासरी सारख्या अप्रतिम वाद्यावरील रुपकातून मानवाबद्दल, प्रेमाबद्दल सुरेख भाष्य करणारं हे गीत.
*सातों बार बोले बंसी
एक ही बार बोले ना
तनकी लागी सारी बोले,
मनकी लागी खोले ना*
बासरीवरच्या आठ छेदांमधून संगीत निर्माण होतं. सात छेदांमधून सात सूर. बोटांच्या हालचालींप्रमाणे उघडबंद होत सुरावट व संगीत निर्माण करणारी बासरी. पण त्या सात सूरांमध्येच बोलणार. आठवा छेद मात्र न बोलता गप्प. पण त्या आठव्या छेदाशिवाय बाकी सप्तसूरांचं अस्तित्व देखील अशक्य.
मनुष्याचं देखील तसंच आहे. प्रसंगानुरूप वेगवेगळ्या भावभावनांचं प्रदर्शन होइल, माणूस बोलून व्यक्त होइल पण काही प्रसंग असे की तो मूक राहील - त्या आठव्या छेदाप्रमाणे. जेव्हा भावना हृदयाच्या अतीव जवळची असेल तेव्हा. ह्या गीताच्या संदर्भात प्रेमभावना. शरीरावरील घाव व फुंकर ह्याबद्दल बोलेल माणूस. पण मनावरचा घाव आणि फुंकर दोन्ही त्या आठव्या छेदाप्रमाणे मूकच रहातात आणि जीवनातील सप्तसूरांना अस्तित्व देत रहातात.
*चुपके सुर में भेद छुपाये,
फूँक-फूँक बतलाये,
तन की सीधी मन की धुन्नी,
पच्चीस पेंचे खाए,
हाँ बोले ना बोले ना,
हाँ बोले ना बोले ना
तनकी लागी सारी बोले,
मनकी लागी खोले ना*
सात सूरांसाठीचे ते सात छेद. प्रत्येक छेदात एक सूर लपलाय. त्याच्यावरचं बोट उठतं आणि ती फुंकर तिथून बाहेर पडते तेव्हा तो सूर त्या छेदाचा आवाज बनून बोलतो. कोणत्याही सुरावटीत वा गाण्यात आळीपाळीने हे छेद सूरांच्या बोलीभाषेत बोलतात. म्हणजे इतकी सरळसोट असलेली बासरी पण तिचं भाष्य बघा कसं मनस्वी. स्वभाव कसा लहरी.
मनुष्याचं ही तसंच आहे की. वरवर सरळ दिसणारा, व्यवहाराच्या चौकटीत राहून वागणारा नी बोलणारा माणूस, मनाशी नाजूकपणे निगडित व्यक्तीचा, गोष्टीचा संबंध आला की किती मनस्वी होतो नाही ! स्वभावाचे किती कंगोरे ! त्या मनस्वितेवर, लहरीपणावर आणि परिस्थिती (कोणत्या छेदावरचं बोट वर होतय) वर अशा नाजूक क्षणीची प्रतिक्रिया, उक्ती व कृती अवलंबून. प्रेम, माया, आपुलकी, रुसवा, राग, इर्षा, क्रोध, दु:ख - निरनिराळ्या परिस्थितीत व एखाद्या छेदातून फुंकर बाहेर पडते की त्यावर बोट आल्यामुळे दुसऱ्या छेदातून - यावर प्रतिक्रिया, कृती वा उक्ती अवलंबून असते. म्हणूनच कधीकधी ती अपेक्षित तर कधी अनाकलनीय असते. कधी होकार तर कधी नकार आणि कधी मौन. आणि हे सारं प्रेमाच्या संदर्भात असेल तर अजून गुंतागुंत.
*प्रीत की पीड़ा जाने मुई,
छाती छेद पड़े,
उठ-उठ के फिर मुँह लगती है,
कान्हा संग लड़े,
हो.. हाँ बोले ना बोले ना,
हाँ बोले ना बोले ना
तनकी लागी सारी बोले,
मनकी लागी खोले ना*
राधा कृष्ण हे साक्षात प्रेमाचं जीवंत प्रतीक आणि त्यांच्या प्रेमाची साक्षी ती बासरी जी कायम कृष्णाच्या ओठाशी बिलगलेली. कान्हाच्या मुखातून त्याच्या राधेवरील प्रेमाची कहाणी सूरातून ऐकवणारी. पण खरच का हीच ती बासरी ?
की कृष्ण आपल्यापेक्षा राधेवर जास्त प्रेम करतो म्हणून त्याच्याशी तोंडाला तोंड लावून भांडण करणारी ? सूरासूरातून त्याच्याकडे तक्रार करणारी ! कोणती बासरी खरी ?
की हे राधेचं रुप ? तिला सोडून बासरी ओठाला लावणाऱ्या कृष्णाकडे बासरी बनूनच तक्रार करणारी राधा की काय ही ?
कारण दोघीनाही प्रेमातली गोड पण जीवघेणी वेदना माहितीये. हवीहवीशी असलेली. ती माहितीये म्हणून तर छातीवर ते सात छेद आहेत. कृष्णाशी प्रेमाचं भांडण सप्तसूरातून भांडायला. म्हणून मग मनवायला जरी प्रत्यक्ष कृष्ण असला तरी कधी होकार तर कधी नकार. किती तरल काव्यमयता ही !
कृष्णाच्या कायम ओठाशी असलेली ही बासरी - मूर्तीमंत प्रेमाचं प्रतीक. पण गुलझार चं गुलझारपण ह्यात की तो, ते सरळ साध्या प्रकारचं प्रेम म्हणून श्रोत्यांसमोर आणत नाही तर आणतो प्रेमातील लटक्या भांडणाच्या रुपाने. कुठल्याही नात्यात फक्त गोडगोडपणा असला तर नातं सपक होतं. त्यात लटक्या का होइना, भांडणाचं, रुसव्या फुगव्याचं मीठ हवंच. तरच त्या नात्याला चव येते. भले लटकं असेल भांडण नी त्यातला रुसवा फुगवा. पण त्यानंतर काढलेल्या समजूतीनंतरचा मिलाप अधिक खास नी खुमासदार असतो.
सात सूरातून बोलणारी ती बासरी. ती राधा. आणि तिच्यात प्रेमाच्या प्राणवायूची फुंकर घालणारा कृष्ण. तो आठवा छेद त्या प्राणवायूच्या फुंकरीसाठी राखीव आहे. प्रेमाचा प्राणवायू. म्हणून तो आठवा छेद स्वत: मूक राहून आयुष्याला प्रेमाच्या सप्तसूरांची सुरावट देतो.
एका कार्यक्रमात सूत्रसंचालिका मंगलाताई खाडिलकर ह्यांनी "मी राधिका मी प्रेमिका" हे गीत गायिकेने गायच्या आधी पार्श्वभूमी तयार करताना सांगितल्याप्रमाणे राधा जेव्हा बासरीला म्हणते की तू किती भाग्यवान की तू कायम श्रीरंगाच्या ओठांशी असतेस तेव्हा बासरी म्हणते की बाई गं मी तर आतून पूर्ण पोकळ आणि उरावर छेद. तो पोकळपणा स्वत:ला कृष्णरूप करण्यासाठी आहे. माझ्या आत फक्त कृष्ण असावा आणि उरातील छेदातून कृष्णप्रेमच झिरपावं. पण तू सुद्धा तर माझ्या सारखीच आहेस. ह्यावर राधा हसते कारण तिला स्वत:लाही माहिती असतं की श्रीकृष्ण हे चित्-तत्व आहे तर ती स्वत: म्हणजेच राधा हा त्या चित्-तत्वाचा विलास आहे. ती जेव्हा राधेच्या रुपातून त्या परमतत्वाकडे जाते तेव्हा अध्यात्माच्या खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर जाते. पण जेव्हा ती त्या तत्वातून निघते तेव्हा धारा असते.
"युगंधर" च्या प्रस्तावनेत श्रीं शिवाजी सावंतानी राधा शब्दाची व्युत्पत्ती सांगितली आहे की रा म्हणजे मिळो / लाभो आणि धा म्हणजे मोक्ष. मोक्ष मिळो वा लाभो अशी प्रार्थना करणारी प्रत्येक व्यक्ती राधा आहे.
मोक्ष मिळो अशी प्रार्थना करणारी व त्यासाठी कृष्णाकडे आकृष्ट होणारी ती राधा आणि त्याच्याशी एकरूप होऊन मोक्ष मिळालेली, कृष्णापासून निघालेली ती धारा.
दोन भिन्न कलाकारांचं हे दोन वेगळ्या संदर्भात निरूपण. पण ह्या सातो बार च्या रसास्वादात दोन्ही निरुपणं कशी चपखल बसतात.
काय म्हणता ? बासरीचा सबंध काय मोक्षाच्या संदर्भात असं ? अहो, संगीत ही अशी कला आहे की जे लाखो शब्दातून समजावता येणार नाही ते एका तानेतून, एका सुरातून आकळू शकतं. संगीताला नादब्रह्म म्हणतात ते ह्याचमुळे. आणि अशा संगीतातील एक वाद्य असलेली बासरी जी कायम कृष्णाच्या ओठांशी असते तिच्यापेक्षा मोक्ष अधिक कोणाला कळणार आणि मोक्षाप्रत जायला तिच्याहून अधिक सरल नी प्रभावी साधन कोणतं ? फक्त अंतरी राधेप्रमाणेच निस्सीम कृष्णप्रेम हवं.
किती अप्रतिम रुपक आहे हे गाणं - सातो बार बोले बन्सी. आणि हे जादुई शब्द जेव्हा पंचमच्या सूरांचा साज चढवून आशाच्या अलौकिक दैवी आवाजातून गीतरुपाने साकार होतात तेव्हा जणू प्रत्यक्ष राधाकृष्णाच्या लटक्या भांडणातून फुलणारं, जीवाला गोड ओढ नी हूरहूर लावणारं प्रेम आपल्या साक्षीने फुलतय असं वाटतं.
खूप गाणी आपल्याला आवडतात. अतिशय आवडतात. ऐकताक्षणी वाह येतं तोंडातून. पण फार थोडी गाणी ऐकताना आह येतं हृदयातून.
हे गाणं तसं आहे आणि त्यात सगळ्यात जास्त जादू व करिष्मा शब्दांच्या त्या जादूगाराचा आहे - गुलझार नावाच्या जादूगाराचा.
---- मनिष मोहिले
पण काय लिहावं ? कितीतरी जणांनी गुलजारवर; त्याच्या कवितेवर पुष्कळ काही लिहीलं आहे. त्यातील काही तर दादा मंडळी असतील.
अस्मादिकानी सुद्धा गुलजारवर एकदा लिहीण्याचं धाडस केलेलं आहे. त्या लेखात एक संवेदनशील, शब्दांवर अफाट पकड व प्रभुत्व असलेला, अत्यंत अभिनव कल्पनाशक्तीचं आपल्या कवितातून दर्शन घडवणारा कवी, एक प्रथितयश गीतकार, दिग्दर्शक, कथा व पटकथा लेखक अशा त्याच्या विविध पैलूंबद्दल व त्या क्षेत्रातील त्याच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल मी लिहीलं होतं. त्याच्या कविता / गाणी / चित्रपट ह्यातील हाताळल्या गेलेल्या विषयांच्या आवाक्याबद्दल व विविधतेबद्दल लिहीलं होतं. आता अजून वेगळं काय लिहायचं ?
शेवटी ठरवलं की समग्र गुलजार असा विषय परत हाताळण्याऐवजी गुलजारच्या असंख्य गीतांपैकी अतिशय आवडणारं एखादं गीत निवडून त्याबद्दल लिहायचं.
हा विचार नक्की झाल्यावर मग पुढचा विचार ! कोणतं गाणं निवडावं? हा विचार करताना राहून राहून एक गाणं माझ्या मनात येत होतं.
गुलजार, आर डी व आशा या संगीतक्षेत्रातील दिग्गज त्रयीचा चित्रपटेतर गाण्यांचा एक संग्रह आहे - दिल पडोसी है !
त्यातील सातों बार बोले बंसी.
गुलजारच्या असंख्य आवडत्या गीतांपैकी माझ्या अतिशय आवडीचं, अतिशय जवळचं असं हे गीत.
बासरी सारख्या अप्रतिम वाद्यावरील रुपकातून मानवाबद्दल, प्रेमाबद्दल सुरेख भाष्य करणारं हे गीत.
*सातों बार बोले बंसी
एक ही बार बोले ना
तनकी लागी सारी बोले,
मनकी लागी खोले ना*
बासरीवरच्या आठ छेदांमधून संगीत निर्माण होतं. सात छेदांमधून सात सूर. बोटांच्या हालचालींप्रमाणे उघडबंद होत सुरावट व संगीत निर्माण करणारी बासरी. पण त्या सात सूरांमध्येच बोलणार. आठवा छेद मात्र न बोलता गप्प. पण त्या आठव्या छेदाशिवाय बाकी सप्तसूरांचं अस्तित्व देखील अशक्य.
मनुष्याचं देखील तसंच आहे. प्रसंगानुरूप वेगवेगळ्या भावभावनांचं प्रदर्शन होइल, माणूस बोलून व्यक्त होइल पण काही प्रसंग असे की तो मूक राहील - त्या आठव्या छेदाप्रमाणे. जेव्हा भावना हृदयाच्या अतीव जवळची असेल तेव्हा. ह्या गीताच्या संदर्भात प्रेमभावना. शरीरावरील घाव व फुंकर ह्याबद्दल बोलेल माणूस. पण मनावरचा घाव आणि फुंकर दोन्ही त्या आठव्या छेदाप्रमाणे मूकच रहातात आणि जीवनातील सप्तसूरांना अस्तित्व देत रहातात.
*चुपके सुर में भेद छुपाये,
फूँक-फूँक बतलाये,
तन की सीधी मन की धुन्नी,
पच्चीस पेंचे खाए,
हाँ बोले ना बोले ना,
हाँ बोले ना बोले ना
तनकी लागी सारी बोले,
मनकी लागी खोले ना*
सात सूरांसाठीचे ते सात छेद. प्रत्येक छेदात एक सूर लपलाय. त्याच्यावरचं बोट उठतं आणि ती फुंकर तिथून बाहेर पडते तेव्हा तो सूर त्या छेदाचा आवाज बनून बोलतो. कोणत्याही सुरावटीत वा गाण्यात आळीपाळीने हे छेद सूरांच्या बोलीभाषेत बोलतात. म्हणजे इतकी सरळसोट असलेली बासरी पण तिचं भाष्य बघा कसं मनस्वी. स्वभाव कसा लहरी.
मनुष्याचं ही तसंच आहे की. वरवर सरळ दिसणारा, व्यवहाराच्या चौकटीत राहून वागणारा नी बोलणारा माणूस, मनाशी नाजूकपणे निगडित व्यक्तीचा, गोष्टीचा संबंध आला की किती मनस्वी होतो नाही ! स्वभावाचे किती कंगोरे ! त्या मनस्वितेवर, लहरीपणावर आणि परिस्थिती (कोणत्या छेदावरचं बोट वर होतय) वर अशा नाजूक क्षणीची प्रतिक्रिया, उक्ती व कृती अवलंबून. प्रेम, माया, आपुलकी, रुसवा, राग, इर्षा, क्रोध, दु:ख - निरनिराळ्या परिस्थितीत व एखाद्या छेदातून फुंकर बाहेर पडते की त्यावर बोट आल्यामुळे दुसऱ्या छेदातून - यावर प्रतिक्रिया, कृती वा उक्ती अवलंबून असते. म्हणूनच कधीकधी ती अपेक्षित तर कधी अनाकलनीय असते. कधी होकार तर कधी नकार आणि कधी मौन. आणि हे सारं प्रेमाच्या संदर्भात असेल तर अजून गुंतागुंत.
*प्रीत की पीड़ा जाने मुई,
छाती छेद पड़े,
उठ-उठ के फिर मुँह लगती है,
कान्हा संग लड़े,
हो.. हाँ बोले ना बोले ना,
हाँ बोले ना बोले ना
तनकी लागी सारी बोले,
मनकी लागी खोले ना*
राधा कृष्ण हे साक्षात प्रेमाचं जीवंत प्रतीक आणि त्यांच्या प्रेमाची साक्षी ती बासरी जी कायम कृष्णाच्या ओठाशी बिलगलेली. कान्हाच्या मुखातून त्याच्या राधेवरील प्रेमाची कहाणी सूरातून ऐकवणारी. पण खरच का हीच ती बासरी ?
की कृष्ण आपल्यापेक्षा राधेवर जास्त प्रेम करतो म्हणून त्याच्याशी तोंडाला तोंड लावून भांडण करणारी ? सूरासूरातून त्याच्याकडे तक्रार करणारी ! कोणती बासरी खरी ?
की हे राधेचं रुप ? तिला सोडून बासरी ओठाला लावणाऱ्या कृष्णाकडे बासरी बनूनच तक्रार करणारी राधा की काय ही ?
कारण दोघीनाही प्रेमातली गोड पण जीवघेणी वेदना माहितीये. हवीहवीशी असलेली. ती माहितीये म्हणून तर छातीवर ते सात छेद आहेत. कृष्णाशी प्रेमाचं भांडण सप्तसूरातून भांडायला. म्हणून मग मनवायला जरी प्रत्यक्ष कृष्ण असला तरी कधी होकार तर कधी नकार. किती तरल काव्यमयता ही !
कृष्णाच्या कायम ओठाशी असलेली ही बासरी - मूर्तीमंत प्रेमाचं प्रतीक. पण गुलझार चं गुलझारपण ह्यात की तो, ते सरळ साध्या प्रकारचं प्रेम म्हणून श्रोत्यांसमोर आणत नाही तर आणतो प्रेमातील लटक्या भांडणाच्या रुपाने. कुठल्याही नात्यात फक्त गोडगोडपणा असला तर नातं सपक होतं. त्यात लटक्या का होइना, भांडणाचं, रुसव्या फुगव्याचं मीठ हवंच. तरच त्या नात्याला चव येते. भले लटकं असेल भांडण नी त्यातला रुसवा फुगवा. पण त्यानंतर काढलेल्या समजूतीनंतरचा मिलाप अधिक खास नी खुमासदार असतो.
सात सूरातून बोलणारी ती बासरी. ती राधा. आणि तिच्यात प्रेमाच्या प्राणवायूची फुंकर घालणारा कृष्ण. तो आठवा छेद त्या प्राणवायूच्या फुंकरीसाठी राखीव आहे. प्रेमाचा प्राणवायू. म्हणून तो आठवा छेद स्वत: मूक राहून आयुष्याला प्रेमाच्या सप्तसूरांची सुरावट देतो.
एका कार्यक्रमात सूत्रसंचालिका मंगलाताई खाडिलकर ह्यांनी "मी राधिका मी प्रेमिका" हे गीत गायिकेने गायच्या आधी पार्श्वभूमी तयार करताना सांगितल्याप्रमाणे राधा जेव्हा बासरीला म्हणते की तू किती भाग्यवान की तू कायम श्रीरंगाच्या ओठांशी असतेस तेव्हा बासरी म्हणते की बाई गं मी तर आतून पूर्ण पोकळ आणि उरावर छेद. तो पोकळपणा स्वत:ला कृष्णरूप करण्यासाठी आहे. माझ्या आत फक्त कृष्ण असावा आणि उरातील छेदातून कृष्णप्रेमच झिरपावं. पण तू सुद्धा तर माझ्या सारखीच आहेस. ह्यावर राधा हसते कारण तिला स्वत:लाही माहिती असतं की श्रीकृष्ण हे चित्-तत्व आहे तर ती स्वत: म्हणजेच राधा हा त्या चित्-तत्वाचा विलास आहे. ती जेव्हा राधेच्या रुपातून त्या परमतत्वाकडे जाते तेव्हा अध्यात्माच्या खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर जाते. पण जेव्हा ती त्या तत्वातून निघते तेव्हा धारा असते.
"युगंधर" च्या प्रस्तावनेत श्रीं शिवाजी सावंतानी राधा शब्दाची व्युत्पत्ती सांगितली आहे की रा म्हणजे मिळो / लाभो आणि धा म्हणजे मोक्ष. मोक्ष मिळो वा लाभो अशी प्रार्थना करणारी प्रत्येक व्यक्ती राधा आहे.
मोक्ष मिळो अशी प्रार्थना करणारी व त्यासाठी कृष्णाकडे आकृष्ट होणारी ती राधा आणि त्याच्याशी एकरूप होऊन मोक्ष मिळालेली, कृष्णापासून निघालेली ती धारा.
दोन भिन्न कलाकारांचं हे दोन वेगळ्या संदर्भात निरूपण. पण ह्या सातो बार च्या रसास्वादात दोन्ही निरुपणं कशी चपखल बसतात.
काय म्हणता ? बासरीचा सबंध काय मोक्षाच्या संदर्भात असं ? अहो, संगीत ही अशी कला आहे की जे लाखो शब्दातून समजावता येणार नाही ते एका तानेतून, एका सुरातून आकळू शकतं. संगीताला नादब्रह्म म्हणतात ते ह्याचमुळे. आणि अशा संगीतातील एक वाद्य असलेली बासरी जी कायम कृष्णाच्या ओठांशी असते तिच्यापेक्षा मोक्ष अधिक कोणाला कळणार आणि मोक्षाप्रत जायला तिच्याहून अधिक सरल नी प्रभावी साधन कोणतं ? फक्त अंतरी राधेप्रमाणेच निस्सीम कृष्णप्रेम हवं.
किती अप्रतिम रुपक आहे हे गाणं - सातो बार बोले बन्सी. आणि हे जादुई शब्द जेव्हा पंचमच्या सूरांचा साज चढवून आशाच्या अलौकिक दैवी आवाजातून गीतरुपाने साकार होतात तेव्हा जणू प्रत्यक्ष राधाकृष्णाच्या लटक्या भांडणातून फुलणारं, जीवाला गोड ओढ नी हूरहूर लावणारं प्रेम आपल्या साक्षीने फुलतय असं वाटतं.
खूप गाणी आपल्याला आवडतात. अतिशय आवडतात. ऐकताक्षणी वाह येतं तोंडातून. पण फार थोडी गाणी ऐकताना आह येतं हृदयातून.
हे गाणं तसं आहे आणि त्यात सगळ्यात जास्त जादू व करिष्मा शब्दांच्या त्या जादूगाराचा आहे - गुलझार नावाच्या जादूगाराचा.
---- मनिष मोहिले