पर्यावरणाचा बिघडलेला समतोल ही आधुनिक मानवजातीपुढील एक अत्यंत गंभीर समस्या आहे. गेल्या चार एक दशकांपासून मानवाला ही जाणीव झाली आहे आणि त्यावर विविध उपाययोजना देखील केल्या जात आहेत.
वातावरणातील ओझोन थराला पडलेले छिद्र, ध्रुवीय प्रदेशातील बर्फाच्या वितळण्याचा वाढता वेग, समुद्राच्या पाण्यातील वाढते प्रदूषण, वाढते उद्योगधंदे व वाहने यामुळे वाढणारा कर्बवायू आणि घटणारा प्राणवायू, मोठ्या प्रमाणावर झालेला व होणारा जंगलांचा ऱ्हास, अशा विविध समस्यांवर ह्या उपाययोजना केल्या जात आहेत किंवा तसे प्रयत्न होत आहेत.
ह्यापैकीच एक अत्यंत महत्वाची समस्या म्हणजे वृक्षतोड, त्यामुळे होणारा जंगलांचा ऱ्हास, त्याच्याशी संबंधित वन्यजीवन व परिस्थितीकीचा नाश / असमतोल आणि वाढणाऱ्या कर्बवायूच्या संकटात घातली जाणारी भर. अर्थात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून, किंबहुना नवीन जंगले उगवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून मानव ह्या समस्येशी मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहे. झाडे प्रकाशसंश्लेषण करून अन्न तयार करताना वातावरणातील कर्बवायू ग्रहण करतात आणि प्राणवायू वातावरणात सोडतात हे आपण शाळेपासून शिकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर केली जाणारी वृक्ष लागवड आणि जंगल निर्मितीचे प्रयत्न हा वाढता कर्बवायू कमी करण्याबरोबरच प्राणवायूचं प्रमाण वाढवण्यासाठी एक खात्रीलायक उपाय आहे.
पण हे खरंच असं आहे का ? किंवा आपण ज्या पद्धतीने ही झाडांची लागवड करतोय त्यातून अपेक्षित परिणाम अपेक्षित प्रमाणात खरोखरच मिळतोय का ?
हा प्रश्न / ही शंका उद्भवण्याचं कारण आहे की काही शास्त्रज्ञांच्या मते निव्वळ पुष्कळ झाडं लावून अपेक्षित परिणाम तर मिळणार नाहीच पण इतर काही समस्याना तोंड द्यावं लागेल. नक्की काय निरीक्षण आहे त्यांचं ? हे समजण्यासाठी वृक्षसृष्टीची निर्मिती कशी झाली ते थोडंसं पहावं लागेल.
पृथ्वीवर जीवनासाठी आवश्यक वातावरण तयार झाल्यावर प्राणीसृष्टी निर्माण होण्याच्या खूप आधी आपली जंगले व वृक्षसृष्टी निर्माण झाली. (पाईन जातीचे काही वृक्ष हे सर्वात जुने सजीव मानले जातात).
जर आपण शाळेत शिकलेल्या भूगोलाची थोडी उजळणी केली तर आपल्या लक्षात येते की निसर्गाने एका विशिष्ट पद्धतीने व स्थान क्रमाने ही वृक्षसृष्टी निर्माण केली आहे.
धुवीय प्रदेश संपता संपता त्यांच्या कडेवर सूचीपर्णी (सुईसारखी पाने किंवा पानांच्या जागी शंकू असलेली) वृक्षांची जंगले (Coniferous Taiga forests) जी वातावरणातील दोन तृतीयांश प्राणवायूचा स्त्रोत आहेत (as per Planrt Earth BBC). त्यानंतर समशीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश (Prairies, Pampas, Steppe, Veldt, Downe), त्यानंतर पानगळीच्या वृक्षांची जंगले (deciduous forests), त्यानंतर उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश (savannas) व त्यानंतर विषुववृत्ताच्या जवळ सदाहरित जंगले (rain forests) अशी साधारण वर्गवारी आहे.
वेगवेगळ्या प्रदेशातील तापमान, पर्जन्यमान, मातीची प्रत व पाणी साठवण्याची क्षमता, जमिनीचा उतार इत्यादी मध्ये जो फरक आहे त्याप्रमाणे कित्येक हजारो लाखो वर्षांच्या कालावधीत निसर्गाने ही मांडणी केली. ह्या विभागवार वृक्ष संरचनेबरोबरच त्या त्या विभागात एक वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता व परिस्थितीकी ह्यांची देखील निर्मिती झाली. निसर्गाने केलेली ही रचना आणि ह्यातील प्राणी व वनस्पती ह्यांचं परस्परावलंबन व प्राण्यांमधील परस्परावलंबन हे अतिशय गुंतागुंतीचे व हजारो लाखो वर्षांच्या उत्क्रांतीचा परिणाम असलेले असे आहे.
वाढत्या लोकसंख्येबरोबर आणि विशेषकरून औद्योगिक क्रांतीच्या सुरूवातीच्या काळात, (जोपर्यंत आपल्या भस्मासूरी कृत्यांचे परिणाम दिसायला सुरूवात झाली नव्हती तोपर्यंत) मानवाने वरीलपैकी कशाचाही विचार न करता झाडे तोडली व पर्यावरणाला जबरदस्त हानी पोचवली. ह्यात जंगलांच्या नाशाबरोबरच, त्या परिसरातील जैवविविधतेची देखील मोठ्या प्रमाणावर हानी झाली.
झाडे तोडल्यामुळे वातावरणातील वाढत्या कर्बवायू व घटत्या प्राणवायूच्या संकटाची जाणीव झाल्यावर आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीला सुरूवात केली. नवीन जंगलं च्या जंगलं निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करतोय जो स्तुत्य आहे. पण तो अधिक डोळस असणं गरजेचं आहे.
कारण आपण एखाद्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर एकाच जातीच्या झाडांची लागवड करतो ज्यामध्ये वनस्पतीसृष्टीतील विविधतेचा समतोल तर बिघडतोच पण त्या परिस्थितीकीतील इतर जैवविविधतेवर देखील वाईट परिणाम होतो.
नुकतेच यासंदर्भात दोन संशोधन निबंध प्रकाशित झाले. एका निबंधाचा विषय होता २०३० सालापर्यंत जागतिक पातळीवर ३५०० लाख हेक्टर जमिनीवर जंगले निर्माण करण्यासाठी जो प्रकल्प (ज्यात आत्तापर्यंत ४० देश सहभागी झाले आहेत) सुरू झाला आहे तो कितपत यशस्वी व परिणामकारक आहे ? तर या संशोधकांच्या पाहणीप्रमाणे या प्रकल्पांतर्गत जी आर्थिक मदत पुरवण्यात आली त्यामुळे लोकानी, जैवविविधता वा वृक्षगट विचारात न घेता एकाच जातीच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली व त्यातही निवडीसाठी जे निकष लावले गेले त्यात व्यापारी तत्वावर कुठली झाडे अधिक फायदेशीर हा निकष सर्वात अग्रक्रमी होता. उघड आहे की जैवविविधतेचं नुकसान करणारा हा निर्णय होता. या निबंधात चिलीमधील वृक्षलागवड प्रकल्पाचे उदाहरण दिले आहे).
हा लेख लिहून संपला आणि माझ्याकडे माझ्यस मित्राकदून अशी एक चित्रफीत आली की त्या चित्रफितीचा व त्यातील माहितीचा अंतर्भाव करणं मला अतिशय आवश्यक वाटलं.
ह्या चित्रफितीत माहिती आहे की सध्या जागतिक पातळीवर केळ्यांच्या रोपांवर Panama Disease नावाचा रोग हल्ला करतोय व त्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश करतोय. आज ही परिस्थिती केळ्यांची बागायत व त्यावर आधारीत उद्योग व लोक ह्यांच्यासाठी क मोठी समस्या बनली आहे . ह्यामागचं मुख्य कारण आहे Cavendish नावाच्या एकाच प्रजातीची खूप मोठ्या प्रमाणावर लागवड. Cavendish च्या इतक्या मोठ्या लागवडीमागचं कारण सोप्पे व अपेक्षित असे व्यापारी कारण आहे. ही प्रजाती जास्तीत जास्त उत्पादन देत असल्यामुळे उत्पादनखर्च कमी होऊन नफ्यात वाढ होते. पण एकाच जातीची ही रोपं एखाद्या मातब्बर रोगासमोर एकाच वेळी मान टाकू शकतात. आज हे सिद्ध झाले आहे. त्यातून १९५० साली ह्याच पनामा रोगाच्या आधीच्या अवताराने Big Mike नावाची केळ्याची प्रजाती नामशेष केली होती. तेव्हाच्या रोगाला तोंड देऊ शकणारी व त्यामुळे Big Mike ची जागा घेतलेली Cavendish पनामा रोगाच्या नव्या अवतारापुढे हतबल आहे.
ह्यावर नवीन प्रजाती शोधणे हा एकमेव उपाय नसून त्याचबरोबर अधिक गरजेचा व मूलगामी उपाय आहे केळीच्या बागातून विविध प्रजातीची रोपं लावणे व जे जमवून घेऊ शकतात अशी इतर झाडे वा झुडपे लावणे जी ज्या fungi मुळे हा रोग पसरतो त्या fungi चा नाश करू शकतात. नवीन वृक्षलागवड करताना जैवविविधता लक्षात घेणं व त्यास प्राधान्य देणं का आवश्यक आहे हे आपल्याला नक्कीच स्पष्ट होतं.
दुसऱ्या संशोधन निबंधातून संशोधकांनी असं निरीक्षण मांडलं की ज्या जमिनीत सेंद्रीय कर्बघनता (Soil Organic Carbon Density) कमी आहे तिथे नवीन झाडे लावल्याने फायदा होतो व त्या जमिनीतील सेंद्रीय कर्बघनता वाढीस लागते.
मात्र ज्या जमिनीत ही सेंद्रीय कर्बघनता मुळातच भरपूर आहे अशा ठिकाणी नवीन झाडे लावल्यावर त्या जमिनीत ह्या घनतेत घट येते. ह्या निबंधात उत्तर चीनमध्ये वृक्षलागवडीनंतर मातीच्या नमुन्यांच्या परीक्षणानंतरच्या परिणामांचे विश्लेषण करून त्याआधारे भाष्य केलेले आहे ).
दोन्हीही निबंध Nature Sustainability ह्या science journal मध्ये प्रकाशित झाले आहेत.
(जमिनीतील सेंद्रीय कर्बघनतेचे प्रमाण हे वातावरणातून कर्बवायू किती कमी झाला ह्याचे एक मोजमाप आहे. जर खूप मोठ्या क्षेत्रफळात जमिनीत ह्या सेंद्रीय कर्बघनता प्रमाणात वाढ झाली तर वातावरणातील कर्बवायू मोठ्या प्रमाणात कमी झाला ह्याचे ते निर्देशक आहे).
विचार करण्याची ही एक वेगळी व नवी दिशा आहे पण निश्चीतच अत्यंत महत्वपूर्ण असा हा विचार आहे.
एका समस्येवरील समाधान म्हणून करत असलेल्या उपाययोजनेचे असे काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असेल तर त्या उपाययोजनेचा समूळ अभ्यास व त्यात आवश्यक ते धोरणात्मक व कृतीशील बदल करणे व वेळेत करणे गरजेचे आहे.
उदाहरणार्थ, धोरणात्मक रित्या एखाद्या परिसरात वृक्ष लागवड करताना व्यापारी फायद्याच्या ऐवजी त्या परिसरातील नैसर्गिक घटक व जैवविविधता ह्याच्याशी सुसंगत अशा वृक्षगटांना प्राधान्यक्रम देणे व कृतीशील म्हणजे ते प्रत्यक्षात होत आहे ह्याची खात्री करून देणारी व्यवस्था उभारणे.
आणि त्याचबरोबर जरूरी आहे की नैसर्गिकरीत्या ज्या परिस्थितीकी अजूनही मूळ अवस्थेत आहेत वा ज्यांची फार हानी झालेली नाही तिथे मानवाची लूडबूड अजिबात होऊ न देणे.
वरील अपेक्षा हा भाबडा आशावाद असेल पण कितीही अभ्यास व विश्लेषण करून आपण उपाययोजना केल्या तरी असीम शक्तिशाली निसर्गाने हजारो लाखो वर्षांच्या कालावधीत जी गुंतागुंतीची वृक्ष व प्राणीसृष्टी रचना केली आहे त्याच्या किंचितही जवळ जाणे मानवाच्या मर्यादित शक्ती व कालसीमेच्या बाहेरची गोष्ट आहे, हे वेळीच ओळखून आपण स्वत:ला थांबवलं नाही तर; नंतर कितीही उपाययोजना केल्या तरी त्यांचा फायदा होणार नाही.
https://www.bbc.com/news/science-environment-53138178
---- मनिष मोहिले
वातावरणातील ओझोन थराला पडलेले छिद्र, ध्रुवीय प्रदेशातील बर्फाच्या वितळण्याचा वाढता वेग, समुद्राच्या पाण्यातील वाढते प्रदूषण, वाढते उद्योगधंदे व वाहने यामुळे वाढणारा कर्बवायू आणि घटणारा प्राणवायू, मोठ्या प्रमाणावर झालेला व होणारा जंगलांचा ऱ्हास, अशा विविध समस्यांवर ह्या उपाययोजना केल्या जात आहेत किंवा तसे प्रयत्न होत आहेत.
ह्यापैकीच एक अत्यंत महत्वाची समस्या म्हणजे वृक्षतोड, त्यामुळे होणारा जंगलांचा ऱ्हास, त्याच्याशी संबंधित वन्यजीवन व परिस्थितीकीचा नाश / असमतोल आणि वाढणाऱ्या कर्बवायूच्या संकटात घातली जाणारी भर. अर्थात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून, किंबहुना नवीन जंगले उगवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून मानव ह्या समस्येशी मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहे. झाडे प्रकाशसंश्लेषण करून अन्न तयार करताना वातावरणातील कर्बवायू ग्रहण करतात आणि प्राणवायू वातावरणात सोडतात हे आपण शाळेपासून शिकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर केली जाणारी वृक्ष लागवड आणि जंगल निर्मितीचे प्रयत्न हा वाढता कर्बवायू कमी करण्याबरोबरच प्राणवायूचं प्रमाण वाढवण्यासाठी एक खात्रीलायक उपाय आहे.
पण हे खरंच असं आहे का ? किंवा आपण ज्या पद्धतीने ही झाडांची लागवड करतोय त्यातून अपेक्षित परिणाम अपेक्षित प्रमाणात खरोखरच मिळतोय का ?
हा प्रश्न / ही शंका उद्भवण्याचं कारण आहे की काही शास्त्रज्ञांच्या मते निव्वळ पुष्कळ झाडं लावून अपेक्षित परिणाम तर मिळणार नाहीच पण इतर काही समस्याना तोंड द्यावं लागेल. नक्की काय निरीक्षण आहे त्यांचं ? हे समजण्यासाठी वृक्षसृष्टीची निर्मिती कशी झाली ते थोडंसं पहावं लागेल.
पृथ्वीवर जीवनासाठी आवश्यक वातावरण तयार झाल्यावर प्राणीसृष्टी निर्माण होण्याच्या खूप आधी आपली जंगले व वृक्षसृष्टी निर्माण झाली. (पाईन जातीचे काही वृक्ष हे सर्वात जुने सजीव मानले जातात).
जर आपण शाळेत शिकलेल्या भूगोलाची थोडी उजळणी केली तर आपल्या लक्षात येते की निसर्गाने एका विशिष्ट पद्धतीने व स्थान क्रमाने ही वृक्षसृष्टी निर्माण केली आहे.
धुवीय प्रदेश संपता संपता त्यांच्या कडेवर सूचीपर्णी (सुईसारखी पाने किंवा पानांच्या जागी शंकू असलेली) वृक्षांची जंगले (Coniferous Taiga forests) जी वातावरणातील दोन तृतीयांश प्राणवायूचा स्त्रोत आहेत (as per Planrt Earth BBC). त्यानंतर समशीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश (Prairies, Pampas, Steppe, Veldt, Downe), त्यानंतर पानगळीच्या वृक्षांची जंगले (deciduous forests), त्यानंतर उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश (savannas) व त्यानंतर विषुववृत्ताच्या जवळ सदाहरित जंगले (rain forests) अशी साधारण वर्गवारी आहे.
वेगवेगळ्या प्रदेशातील तापमान, पर्जन्यमान, मातीची प्रत व पाणी साठवण्याची क्षमता, जमिनीचा उतार इत्यादी मध्ये जो फरक आहे त्याप्रमाणे कित्येक हजारो लाखो वर्षांच्या कालावधीत निसर्गाने ही मांडणी केली. ह्या विभागवार वृक्ष संरचनेबरोबरच त्या त्या विभागात एक वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता व परिस्थितीकी ह्यांची देखील निर्मिती झाली. निसर्गाने केलेली ही रचना आणि ह्यातील प्राणी व वनस्पती ह्यांचं परस्परावलंबन व प्राण्यांमधील परस्परावलंबन हे अतिशय गुंतागुंतीचे व हजारो लाखो वर्षांच्या उत्क्रांतीचा परिणाम असलेले असे आहे.
वाढत्या लोकसंख्येबरोबर आणि विशेषकरून औद्योगिक क्रांतीच्या सुरूवातीच्या काळात, (जोपर्यंत आपल्या भस्मासूरी कृत्यांचे परिणाम दिसायला सुरूवात झाली नव्हती तोपर्यंत) मानवाने वरीलपैकी कशाचाही विचार न करता झाडे तोडली व पर्यावरणाला जबरदस्त हानी पोचवली. ह्यात जंगलांच्या नाशाबरोबरच, त्या परिसरातील जैवविविधतेची देखील मोठ्या प्रमाणावर हानी झाली.
झाडे तोडल्यामुळे वातावरणातील वाढत्या कर्बवायू व घटत्या प्राणवायूच्या संकटाची जाणीव झाल्यावर आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीला सुरूवात केली. नवीन जंगलं च्या जंगलं निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करतोय जो स्तुत्य आहे. पण तो अधिक डोळस असणं गरजेचं आहे.
कारण आपण एखाद्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर एकाच जातीच्या झाडांची लागवड करतो ज्यामध्ये वनस्पतीसृष्टीतील विविधतेचा समतोल तर बिघडतोच पण त्या परिस्थितीकीतील इतर जैवविविधतेवर देखील वाईट परिणाम होतो.
नुकतेच यासंदर्भात दोन संशोधन निबंध प्रकाशित झाले. एका निबंधाचा विषय होता २०३० सालापर्यंत जागतिक पातळीवर ३५०० लाख हेक्टर जमिनीवर जंगले निर्माण करण्यासाठी जो प्रकल्प (ज्यात आत्तापर्यंत ४० देश सहभागी झाले आहेत) सुरू झाला आहे तो कितपत यशस्वी व परिणामकारक आहे ? तर या संशोधकांच्या पाहणीप्रमाणे या प्रकल्पांतर्गत जी आर्थिक मदत पुरवण्यात आली त्यामुळे लोकानी, जैवविविधता वा वृक्षगट विचारात न घेता एकाच जातीच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली व त्यातही निवडीसाठी जे निकष लावले गेले त्यात व्यापारी तत्वावर कुठली झाडे अधिक फायदेशीर हा निकष सर्वात अग्रक्रमी होता. उघड आहे की जैवविविधतेचं नुकसान करणारा हा निर्णय होता. या निबंधात चिलीमधील वृक्षलागवड प्रकल्पाचे उदाहरण दिले आहे).
हा लेख लिहून संपला आणि माझ्याकडे माझ्यस मित्राकदून अशी एक चित्रफीत आली की त्या चित्रफितीचा व त्यातील माहितीचा अंतर्भाव करणं मला अतिशय आवश्यक वाटलं.
ह्या चित्रफितीत माहिती आहे की सध्या जागतिक पातळीवर केळ्यांच्या रोपांवर Panama Disease नावाचा रोग हल्ला करतोय व त्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश करतोय. आज ही परिस्थिती केळ्यांची बागायत व त्यावर आधारीत उद्योग व लोक ह्यांच्यासाठी क मोठी समस्या बनली आहे . ह्यामागचं मुख्य कारण आहे Cavendish नावाच्या एकाच प्रजातीची खूप मोठ्या प्रमाणावर लागवड. Cavendish च्या इतक्या मोठ्या लागवडीमागचं कारण सोप्पे व अपेक्षित असे व्यापारी कारण आहे. ही प्रजाती जास्तीत जास्त उत्पादन देत असल्यामुळे उत्पादनखर्च कमी होऊन नफ्यात वाढ होते. पण एकाच जातीची ही रोपं एखाद्या मातब्बर रोगासमोर एकाच वेळी मान टाकू शकतात. आज हे सिद्ध झाले आहे. त्यातून १९५० साली ह्याच पनामा रोगाच्या आधीच्या अवताराने Big Mike नावाची केळ्याची प्रजाती नामशेष केली होती. तेव्हाच्या रोगाला तोंड देऊ शकणारी व त्यामुळे Big Mike ची जागा घेतलेली Cavendish पनामा रोगाच्या नव्या अवतारापुढे हतबल आहे.
ह्यावर नवीन प्रजाती शोधणे हा एकमेव उपाय नसून त्याचबरोबर अधिक गरजेचा व मूलगामी उपाय आहे केळीच्या बागातून विविध प्रजातीची रोपं लावणे व जे जमवून घेऊ शकतात अशी इतर झाडे वा झुडपे लावणे जी ज्या fungi मुळे हा रोग पसरतो त्या fungi चा नाश करू शकतात. नवीन वृक्षलागवड करताना जैवविविधता लक्षात घेणं व त्यास प्राधान्य देणं का आवश्यक आहे हे आपल्याला नक्कीच स्पष्ट होतं.
दुसऱ्या संशोधन निबंधातून संशोधकांनी असं निरीक्षण मांडलं की ज्या जमिनीत सेंद्रीय कर्बघनता (Soil Organic Carbon Density) कमी आहे तिथे नवीन झाडे लावल्याने फायदा होतो व त्या जमिनीतील सेंद्रीय कर्बघनता वाढीस लागते.
मात्र ज्या जमिनीत ही सेंद्रीय कर्बघनता मुळातच भरपूर आहे अशा ठिकाणी नवीन झाडे लावल्यावर त्या जमिनीत ह्या घनतेत घट येते. ह्या निबंधात उत्तर चीनमध्ये वृक्षलागवडीनंतर मातीच्या नमुन्यांच्या परीक्षणानंतरच्या परिणामांचे विश्लेषण करून त्याआधारे भाष्य केलेले आहे ).
दोन्हीही निबंध Nature Sustainability ह्या science journal मध्ये प्रकाशित झाले आहेत.
(जमिनीतील सेंद्रीय कर्बघनतेचे प्रमाण हे वातावरणातून कर्बवायू किती कमी झाला ह्याचे एक मोजमाप आहे. जर खूप मोठ्या क्षेत्रफळात जमिनीत ह्या सेंद्रीय कर्बघनता प्रमाणात वाढ झाली तर वातावरणातील कर्बवायू मोठ्या प्रमाणात कमी झाला ह्याचे ते निर्देशक आहे).
विचार करण्याची ही एक वेगळी व नवी दिशा आहे पण निश्चीतच अत्यंत महत्वपूर्ण असा हा विचार आहे.
एका समस्येवरील समाधान म्हणून करत असलेल्या उपाययोजनेचे असे काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असेल तर त्या उपाययोजनेचा समूळ अभ्यास व त्यात आवश्यक ते धोरणात्मक व कृतीशील बदल करणे व वेळेत करणे गरजेचे आहे.
उदाहरणार्थ, धोरणात्मक रित्या एखाद्या परिसरात वृक्ष लागवड करताना व्यापारी फायद्याच्या ऐवजी त्या परिसरातील नैसर्गिक घटक व जैवविविधता ह्याच्याशी सुसंगत अशा वृक्षगटांना प्राधान्यक्रम देणे व कृतीशील म्हणजे ते प्रत्यक्षात होत आहे ह्याची खात्री करून देणारी व्यवस्था उभारणे.
आणि त्याचबरोबर जरूरी आहे की नैसर्गिकरीत्या ज्या परिस्थितीकी अजूनही मूळ अवस्थेत आहेत वा ज्यांची फार हानी झालेली नाही तिथे मानवाची लूडबूड अजिबात होऊ न देणे.
वरील अपेक्षा हा भाबडा आशावाद असेल पण कितीही अभ्यास व विश्लेषण करून आपण उपाययोजना केल्या तरी असीम शक्तिशाली निसर्गाने हजारो लाखो वर्षांच्या कालावधीत जी गुंतागुंतीची वृक्ष व प्राणीसृष्टी रचना केली आहे त्याच्या किंचितही जवळ जाणे मानवाच्या मर्यादित शक्ती व कालसीमेच्या बाहेरची गोष्ट आहे, हे वेळीच ओळखून आपण स्वत:ला थांबवलं नाही तर; नंतर कितीही उपाययोजना केल्या तरी त्यांचा फायदा होणार नाही.
https://www.bbc.com/news/science-environment-53138178
---- मनिष मोहिले
No comments:
Post a Comment