एका गृपवर आलेल्या एका पोस्टमध्ये मांडलेल्या काही मुद्द्यांना उत्तरे देणारा हा माझा लेख नीट समजावा म्हणून लेखाच्या शेवटी मूळ पोस्ट देत आहे.
माणूस हा इतर सर्व प्राण्यांप्रमाणे स्वभावत: बहुगामी असला तरी संस्कृतीचे टप्पे वर चढताना अनिश्चित बहुगामित्वापेक्षा निश्चित एकगामीत्व त्याला अधिक पटलं असावं.
सांस्कृतिक उत्क्रांती मध्ये निर्माण झालेल्या समाजरचने मध्ये एकगामित्वा मधील परस्पर सहवासामुळे निर्माण होणारे भावनिक बंध व आपुलकी आत्मियता ह्यांचे महत्व निव्वळ शारिरीक आकर्षणापेक्षा अधिक आहे हे नक्की झाले. यात परस्पर मालकी हक्काची भावना देखील महत्वाची ठरली.
यातूनच विवाहसंस्थांचा उदय झाला असावा. दोन व्यक्तींच्या संबंधाना सामाजिक मान्यता निळवून देणारी एक व्यवस्था असे स्वरूप असलेल्या विवाहसंस्थेत कालांतराने बदल होत जाऊन मूळ संबंधाना मान्यताच्या ऐवजी या संस्थेतून दोन अनोळखी व्यक्तींमध्ये संबंध जुळवले जाऊ लागले. मात्र यात अजून एक गोष्ट अशी साध्य झाली की उत्कृष्ट तसेच निकृष्ट सर्व दर्जाच्या स्त्री पुरूषाना एक जोडीदार मिळण्याची शाश्वतता येऊन अनाचार माजण्याची शक्यता पुष्कळ कमी झाली.
आता प्रश्न उद्भवतो तो अशा विवाहसंस्थेतून जे जोडीदार एकत्र येतात ते भावनिक, वैचारीक व अनुभूतिक पातळीवर परस्पराना किती पूरक किंवा अनुरूप आहेत ह्याचा. (कारण सामाजिक आर्थिक धार्मिक इ अनुरूपतेची काळजी ही व्यवस्थाच घेते).
एका घरात वाढलेली भावंडं आई वडिल व मुले ह्यांच्यातही भावनिक वैचारीक अनुभूतिक पातळीवर फरक असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. मग विवाहसंस्थेकडूनच या पातळी वर अनुरूप जोडीदार मिळेल या खात्रीची अपेक्षा का असावी ?
प्रेमविवाहामध्ये सुद्धा या अनुरूपतेची खात्री देता येत नाही कारण प्रेमिक बनून काही तास एकमेकांसोबत घालवणे आणि आयुष्याचे जोडीदार बनून राहणे यात फरक आहे.
विवाह बंधनात असताना दोन्ही बाजूनी प्रथम देण्याची नी मग घेण्याची वृत्ती ठेवली, एकमेकांच्या गुणदोषांसहित एकमेकांचा व्यक्ती म्हणून स्वीकार केला, एकमेकांचे दोष सुधारण्याच्या प्रयत्नातील प्रामाणिकपणा बघितला तर हे नातं उबदार व चिरकाळ टिकणारं होऊ शकतं.
अशा परिस्थितीतही परपुरूष अगर परस्त्री बद्दल विविध कारणांसाठी आकर्षण वाटणं शक्य आहे.ते संबंध मैत्री (शारिरीक आकर्षणाच्या जाणीवेसकट ) पर्यंत ही जाऊ शकतात. प्रगल्भता आहे ती दोन्ही संबंधांचं एकमेवाद्वितीयपण जाणून दोन्ही नात्यांच्या लक्ष्मण रेषा न ओलांडायची. यात स्वत:शी अप्रामाणिक राहणे वगैरे काहीही नसून उलट पूर्ण जाणीवेनिशी दोन्ही नातेसंबंधाची जपणूक करणे हे महत्वाचं.
दुर्दैवानी वैवाहिक नातं प्रयत्नपूर्वक देखील निभावता येत नसेल तर वास्तविक दृष्ट्या किचकट असली तरी वेगळे होण्याची प्रक्रिया होऊ शकतेच. पण एका नात्यात एकाच नात्याशी प्रामाणिक रहावं. यात मानसिक व्यभिचाराचा भाग नसून आपल्या व जोडीदाराच्या अशा अशारिरीक गरजा ( कारण शारिरीक गरजांची पूर्तता हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे) ज्या पूर्ण करायला आपल्या शिवाय किंवा ऐवजी दुसऱ्या कोणाची गरज असू शकते हे सत्य स्विकारण्याच्या प्रगल्भतेचा भाग आहे.
या सगळ्या प्रकारात विवाहसंस्था कालबाह्य ठरवता येत नाही. आपण चर्चेला जी सुरूवात केली त्यात मनुष्य हा एक प्राणीच असून तो स्वभावत: बहुगामी आहे असं म्हटले आहे. पण मनुष्याकडे विचार व विवेक असल्यामुळे त्याची सांस्कृतिक प्रगती होऊन तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला. जर एक प्राणी म्हणून बहुगामित्व समर्थनीय असेल तर प्राण्यांमध्ये प्रणयाराधन करताना फक्त एक नर व एक मादी असते. आई बहीण वडील भाऊ असे नसते. पण ह्या नात्यातील गमन आपल्याला आपल्या सांस्कृतिक बैठकी मुळे पटत नाही. मग फक्त जोडीदाराच्या बाबतीत हे आदीम पशुत्व जागृत झालं तर त्याला विचार व विवेकाचा अंकुश का लावायचा नाही ?
या माझ्या विचार शृंखलेत स्त्री व पुरूष हे दोघेही व्यक्ती म्हणून समान पातळीवर असणे अभिप्रेत आहे आणि त्यामुळे कालोघात पुरूषप्रधान संस्कृतीचा परिपाक म्हणून जेद असमानता आली तिचा वेगळा उहापोह केला नाही.
------ मनिष मोहिले
एक जुनी पोस्ट
इथेच लिहलेली.
त्यावर फेसबुकवर खूप घमासान रणधुमाळी झाली आणि मग मला त्या पोस्ट मागची भूमिका ही लिहावी लागली. आता सहज आठवली.
मूळ पोस्ट
°°°°°°°°°°°°°
फेसबुकवर झालेली पुरुष सौंदर्यावरची घनघोर चर्चा .. आणि काही जणांशी / जणींशी केलेली मेसेजा - मेसेजी याचा परिपाक म्हणजे एक दोन निष्कर्ष :
माणूस हा इतर सर्व प्राण्यांप्रमाणेच polygamous आहे.
लग्न ही एक अत्यंत कृत्रीम व्यवस्था आहे.
समाजात अनाचार माजू नये यासाठी काही लोकानी मानवाला चारित्र्य नीती अशा भोंगळ शब्दात करकचून आवळले आहे.
माणूस कधीच monogamous नव्हता.
त्याला तसे बनवू पाहणे हा व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणे आहे.
सामाजिक स्वास्थ्यासाठी कुटुंब व्यवस्था स्विकारली तरीही पुढे कधीतरी कोणी तरी आवडल्यास एकमेकांच्या सम्मतीने त्या दोन व्यक्तीस Dating करण्याची मुभा असावी .( अर्थातच या dating चे दुष्परिणाम कुटुंबावर होवू देउ नयेत. ही खबरदारी दोनही व्यक्ती घेतीलच हे गृहीतक.)
यामुळे एकूणच समाजातील / लग्न व्यवस्थेतील स्त्री-पुरुष संबंध सुधारण्यास मदत होइल.
स्त्रीला सुद्धा पर्याय उपलब्ध करून दिल्याने लग्नाचे पुरुष तिची अधिक चांगल्या पद्धतीने काळजी घेतील.
वरील सर्व मते माझी एकट्याची नसली तरी मला स्वत:ला ती पटली आहेत.
आणि ही वैचारिक भूमिका
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
पोस्टमागील वैचारिक मानसिक भूमिकेचा मी इथे आढावा घेतला आहे . आपले मत बनवण्यापूर्वी तो आपण वाचावा यासाठी तो इथे देत आहे.
आपले बरे वाईट मत आपण स्वत: बनवावे. इतरांच्या प्रभावाखाली येवून मत बनवू नये ही विनंती.
Shrirang Jadhav
तर आता पोस्टमध्ये मांडलेल्या विचारांबद्दल..
लग्न ही कृत्रीम व्यवस्था असल्याचे बहुतेक सर्वानाच मान्य आहे.
दोन अत्यंत टोकाच्या विचारांच्या व्यक्तीना एकत्र आणून त्यानी आयुष्यभर एकत्र नांदावे , ते ही सुखाने , असे म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे असे मला वाटते.
केवळ पुरूषच बहुगामी असतो या भोंगळ कल्पनेस पाठिंबा देउन स्त्रियांच्या आदिम आणि नैसर्गिक भावनांचा प्रवृत्तीचा आपण गळा घोटतो आहोत असेच मला वाटते. नैतिकतेच्या खोट्या आणि पुरुषी व्याख्यानी स्त्रियांच्या योनिशुचितेचे अवडंबर विनाकारणच माजवले गेले असल्याचे माझे मत आहे.
योनिशुचितेच्या हिंस्त्र आणि अमानुष समजुतीन्मुळेच सती सारख्या अत्यंत अन्यायकारक आणि पशुला देखील मान खाली घालावी लागेल अशा परंपरा व चालीरीती जन्माला घालण्यात आल्या नि पुरुषानीच त्या अति उत्साहाने पाळायला लावल्या.
जगण्याचा जीवन अनुभवण्याचा स्त्रीचा हक्क तिच्यापासून हिरावून घेण्याच्या सोवळे पाळणे विधवाना क्षौर करावयास लावणे यासारखे रिवाज हा याचाच अतिभयानक परिपाक.
मनुष्य म्हणून जगणे नाकारून केवळ एखाद्या प्राण्याप्रमाणे कोणतीही हौसमौज न करता मन मारून दिवस ढकलत राहून मरणाची वाट बघत राहणे , हे इथल्या विधवांचेच नाही तर बहुतांशी सौभाग्यवतींच्या आयुष्याचे वर्णन आहे असे मला वाटते.
पुरुषी वर्चस्वाखालील स्त्रियांच्या या परिस्थितीवर विचार केल्यास आपल्याला काय पर्याय सापडतो.. तर स्त्रियांचे माणूस म्हणून स्वतंत्र अस्तित्व मान्य करणे , पुरूषां इतकेच मानाचे स्थान त्यानाही मिळावे , दोघानाही समान हक्क असावेत, सध्या प्रचलित असणार्या विवाह व्यवस्थेत पुरुषाइतके त्यांचे ही महत्व असावे , त्याला मिळत असणारे स्वातंत्र्य तिलाही मिळावे.
यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.
विवाह संस्थेच्या अपरिहार्यते संबंधी मला शंका आहे.. तरीही तिचा स्वीकार करून विवाहीत स्त्रीला एखादा पुरुष आवडू नयेच असे म्हणणे हे व्यक्ती स्वातंत्र्याचा शिरच्छेद करणारेच आहे.
अशा एखाद्या आवडलेल्या पुरुषासोबत
काही काळ व्यतित करावासा वाटणे यामध्ये नक्की गैर ते काय ?
माझ्या पोस्टमध्ये डेटिंग हा शब्द आलेला आहे त्याचा मला अभिप्रेत अर्थ एखादी भावोत्कट क्षणानी व्यतित केलेली रोमॅंटिक संध्याकाळ. अशी संध्याकाळ तिच्या आयुष्यात का नसावी ? आणि जर त्या दोन समविचारी अनुरूप व्यक्तीन्मध्ये सहवासाने प्रेमभावना जागृत होवून सेक्सही घडला तर खूप मोठा गहजब माजविण्याचे कारणच काय ?
बंद दारांच्या आड रोज बलात्कार सहन करण्यातच आयुष्य घालवणार्या स्त्रीला अशी तिच्या मनाजोगी सध्याकाळ मिळू नये का ?
आपली स्त्री असा हक्क मागू शकेल या केव कल्पनेनेच पुरुष भयभित होतील. पुरषी अहंकारा नुसार आपल्या स्त्रीला असा मोह होवु नये यासाठी स्वत: मध्ये सुधारणा करून घेतील अन्यथा परीणामांस तयार राहतील .. अर्थात हे स्वप्न रंजन झाले थोडेसे. हे नजीकच्या काळात होणे शक्य नाही पण यावर चर्चा झाल्यास सकारात्मक मानसिकता तयार होवू शकेल असे वाटते....
तर ही झाली माझ्या पोस्टमागील माझी मानसिक वैचारिक पार्श्वभूमी.
©श्रीरंग जाधव.
माणूस हा इतर सर्व प्राण्यांप्रमाणे स्वभावत: बहुगामी असला तरी संस्कृतीचे टप्पे वर चढताना अनिश्चित बहुगामित्वापेक्षा निश्चित एकगामीत्व त्याला अधिक पटलं असावं.
सांस्कृतिक उत्क्रांती मध्ये निर्माण झालेल्या समाजरचने मध्ये एकगामित्वा मधील परस्पर सहवासामुळे निर्माण होणारे भावनिक बंध व आपुलकी आत्मियता ह्यांचे महत्व निव्वळ शारिरीक आकर्षणापेक्षा अधिक आहे हे नक्की झाले. यात परस्पर मालकी हक्काची भावना देखील महत्वाची ठरली.
यातूनच विवाहसंस्थांचा उदय झाला असावा. दोन व्यक्तींच्या संबंधाना सामाजिक मान्यता निळवून देणारी एक व्यवस्था असे स्वरूप असलेल्या विवाहसंस्थेत कालांतराने बदल होत जाऊन मूळ संबंधाना मान्यताच्या ऐवजी या संस्थेतून दोन अनोळखी व्यक्तींमध्ये संबंध जुळवले जाऊ लागले. मात्र यात अजून एक गोष्ट अशी साध्य झाली की उत्कृष्ट तसेच निकृष्ट सर्व दर्जाच्या स्त्री पुरूषाना एक जोडीदार मिळण्याची शाश्वतता येऊन अनाचार माजण्याची शक्यता पुष्कळ कमी झाली.
आता प्रश्न उद्भवतो तो अशा विवाहसंस्थेतून जे जोडीदार एकत्र येतात ते भावनिक, वैचारीक व अनुभूतिक पातळीवर परस्पराना किती पूरक किंवा अनुरूप आहेत ह्याचा. (कारण सामाजिक आर्थिक धार्मिक इ अनुरूपतेची काळजी ही व्यवस्थाच घेते).
एका घरात वाढलेली भावंडं आई वडिल व मुले ह्यांच्यातही भावनिक वैचारीक अनुभूतिक पातळीवर फरक असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. मग विवाहसंस्थेकडूनच या पातळी वर अनुरूप जोडीदार मिळेल या खात्रीची अपेक्षा का असावी ?
प्रेमविवाहामध्ये सुद्धा या अनुरूपतेची खात्री देता येत नाही कारण प्रेमिक बनून काही तास एकमेकांसोबत घालवणे आणि आयुष्याचे जोडीदार बनून राहणे यात फरक आहे.
विवाह बंधनात असताना दोन्ही बाजूनी प्रथम देण्याची नी मग घेण्याची वृत्ती ठेवली, एकमेकांच्या गुणदोषांसहित एकमेकांचा व्यक्ती म्हणून स्वीकार केला, एकमेकांचे दोष सुधारण्याच्या प्रयत्नातील प्रामाणिकपणा बघितला तर हे नातं उबदार व चिरकाळ टिकणारं होऊ शकतं.
अशा परिस्थितीतही परपुरूष अगर परस्त्री बद्दल विविध कारणांसाठी आकर्षण वाटणं शक्य आहे.ते संबंध मैत्री (शारिरीक आकर्षणाच्या जाणीवेसकट ) पर्यंत ही जाऊ शकतात. प्रगल्भता आहे ती दोन्ही संबंधांचं एकमेवाद्वितीयपण जाणून दोन्ही नात्यांच्या लक्ष्मण रेषा न ओलांडायची. यात स्वत:शी अप्रामाणिक राहणे वगैरे काहीही नसून उलट पूर्ण जाणीवेनिशी दोन्ही नातेसंबंधाची जपणूक करणे हे महत्वाचं.
दुर्दैवानी वैवाहिक नातं प्रयत्नपूर्वक देखील निभावता येत नसेल तर वास्तविक दृष्ट्या किचकट असली तरी वेगळे होण्याची प्रक्रिया होऊ शकतेच. पण एका नात्यात एकाच नात्याशी प्रामाणिक रहावं. यात मानसिक व्यभिचाराचा भाग नसून आपल्या व जोडीदाराच्या अशा अशारिरीक गरजा ( कारण शारिरीक गरजांची पूर्तता हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे) ज्या पूर्ण करायला आपल्या शिवाय किंवा ऐवजी दुसऱ्या कोणाची गरज असू शकते हे सत्य स्विकारण्याच्या प्रगल्भतेचा भाग आहे.
या सगळ्या प्रकारात विवाहसंस्था कालबाह्य ठरवता येत नाही. आपण चर्चेला जी सुरूवात केली त्यात मनुष्य हा एक प्राणीच असून तो स्वभावत: बहुगामी आहे असं म्हटले आहे. पण मनुष्याकडे विचार व विवेक असल्यामुळे त्याची सांस्कृतिक प्रगती होऊन तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला. जर एक प्राणी म्हणून बहुगामित्व समर्थनीय असेल तर प्राण्यांमध्ये प्रणयाराधन करताना फक्त एक नर व एक मादी असते. आई बहीण वडील भाऊ असे नसते. पण ह्या नात्यातील गमन आपल्याला आपल्या सांस्कृतिक बैठकी मुळे पटत नाही. मग फक्त जोडीदाराच्या बाबतीत हे आदीम पशुत्व जागृत झालं तर त्याला विचार व विवेकाचा अंकुश का लावायचा नाही ?
या माझ्या विचार शृंखलेत स्त्री व पुरूष हे दोघेही व्यक्ती म्हणून समान पातळीवर असणे अभिप्रेत आहे आणि त्यामुळे कालोघात पुरूषप्रधान संस्कृतीचा परिपाक म्हणून जेद असमानता आली तिचा वेगळा उहापोह केला नाही.
------ मनिष मोहिले
एक जुनी पोस्ट
इथेच लिहलेली.
त्यावर फेसबुकवर खूप घमासान रणधुमाळी झाली आणि मग मला त्या पोस्ट मागची भूमिका ही लिहावी लागली. आता सहज आठवली.
मूळ पोस्ट
°°°°°°°°°°°°°
फेसबुकवर झालेली पुरुष सौंदर्यावरची घनघोर चर्चा .. आणि काही जणांशी / जणींशी केलेली मेसेजा - मेसेजी याचा परिपाक म्हणजे एक दोन निष्कर्ष :
माणूस हा इतर सर्व प्राण्यांप्रमाणेच polygamous आहे.
लग्न ही एक अत्यंत कृत्रीम व्यवस्था आहे.
समाजात अनाचार माजू नये यासाठी काही लोकानी मानवाला चारित्र्य नीती अशा भोंगळ शब्दात करकचून आवळले आहे.
माणूस कधीच monogamous नव्हता.
त्याला तसे बनवू पाहणे हा व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणे आहे.
सामाजिक स्वास्थ्यासाठी कुटुंब व्यवस्था स्विकारली तरीही पुढे कधीतरी कोणी तरी आवडल्यास एकमेकांच्या सम्मतीने त्या दोन व्यक्तीस Dating करण्याची मुभा असावी .( अर्थातच या dating चे दुष्परिणाम कुटुंबावर होवू देउ नयेत. ही खबरदारी दोनही व्यक्ती घेतीलच हे गृहीतक.)
यामुळे एकूणच समाजातील / लग्न व्यवस्थेतील स्त्री-पुरुष संबंध सुधारण्यास मदत होइल.
स्त्रीला सुद्धा पर्याय उपलब्ध करून दिल्याने लग्नाचे पुरुष तिची अधिक चांगल्या पद्धतीने काळजी घेतील.
वरील सर्व मते माझी एकट्याची नसली तरी मला स्वत:ला ती पटली आहेत.
आणि ही वैचारिक भूमिका
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
पोस्टमागील वैचारिक मानसिक भूमिकेचा मी इथे आढावा घेतला आहे . आपले मत बनवण्यापूर्वी तो आपण वाचावा यासाठी तो इथे देत आहे.
आपले बरे वाईट मत आपण स्वत: बनवावे. इतरांच्या प्रभावाखाली येवून मत बनवू नये ही विनंती.
Shrirang Jadhav
तर आता पोस्टमध्ये मांडलेल्या विचारांबद्दल..
लग्न ही कृत्रीम व्यवस्था असल्याचे बहुतेक सर्वानाच मान्य आहे.
दोन अत्यंत टोकाच्या विचारांच्या व्यक्तीना एकत्र आणून त्यानी आयुष्यभर एकत्र नांदावे , ते ही सुखाने , असे म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे असे मला वाटते.
केवळ पुरूषच बहुगामी असतो या भोंगळ कल्पनेस पाठिंबा देउन स्त्रियांच्या आदिम आणि नैसर्गिक भावनांचा प्रवृत्तीचा आपण गळा घोटतो आहोत असेच मला वाटते. नैतिकतेच्या खोट्या आणि पुरुषी व्याख्यानी स्त्रियांच्या योनिशुचितेचे अवडंबर विनाकारणच माजवले गेले असल्याचे माझे मत आहे.
योनिशुचितेच्या हिंस्त्र आणि अमानुष समजुतीन्मुळेच सती सारख्या अत्यंत अन्यायकारक आणि पशुला देखील मान खाली घालावी लागेल अशा परंपरा व चालीरीती जन्माला घालण्यात आल्या नि पुरुषानीच त्या अति उत्साहाने पाळायला लावल्या.
जगण्याचा जीवन अनुभवण्याचा स्त्रीचा हक्क तिच्यापासून हिरावून घेण्याच्या सोवळे पाळणे विधवाना क्षौर करावयास लावणे यासारखे रिवाज हा याचाच अतिभयानक परिपाक.
मनुष्य म्हणून जगणे नाकारून केवळ एखाद्या प्राण्याप्रमाणे कोणतीही हौसमौज न करता मन मारून दिवस ढकलत राहून मरणाची वाट बघत राहणे , हे इथल्या विधवांचेच नाही तर बहुतांशी सौभाग्यवतींच्या आयुष्याचे वर्णन आहे असे मला वाटते.
पुरुषी वर्चस्वाखालील स्त्रियांच्या या परिस्थितीवर विचार केल्यास आपल्याला काय पर्याय सापडतो.. तर स्त्रियांचे माणूस म्हणून स्वतंत्र अस्तित्व मान्य करणे , पुरूषां इतकेच मानाचे स्थान त्यानाही मिळावे , दोघानाही समान हक्क असावेत, सध्या प्रचलित असणार्या विवाह व्यवस्थेत पुरुषाइतके त्यांचे ही महत्व असावे , त्याला मिळत असणारे स्वातंत्र्य तिलाही मिळावे.
यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.
विवाह संस्थेच्या अपरिहार्यते संबंधी मला शंका आहे.. तरीही तिचा स्वीकार करून विवाहीत स्त्रीला एखादा पुरुष आवडू नयेच असे म्हणणे हे व्यक्ती स्वातंत्र्याचा शिरच्छेद करणारेच आहे.
अशा एखाद्या आवडलेल्या पुरुषासोबत
काही काळ व्यतित करावासा वाटणे यामध्ये नक्की गैर ते काय ?
माझ्या पोस्टमध्ये डेटिंग हा शब्द आलेला आहे त्याचा मला अभिप्रेत अर्थ एखादी भावोत्कट क्षणानी व्यतित केलेली रोमॅंटिक संध्याकाळ. अशी संध्याकाळ तिच्या आयुष्यात का नसावी ? आणि जर त्या दोन समविचारी अनुरूप व्यक्तीन्मध्ये सहवासाने प्रेमभावना जागृत होवून सेक्सही घडला तर खूप मोठा गहजब माजविण्याचे कारणच काय ?
बंद दारांच्या आड रोज बलात्कार सहन करण्यातच आयुष्य घालवणार्या स्त्रीला अशी तिच्या मनाजोगी सध्याकाळ मिळू नये का ?
आपली स्त्री असा हक्क मागू शकेल या केव कल्पनेनेच पुरुष भयभित होतील. पुरषी अहंकारा नुसार आपल्या स्त्रीला असा मोह होवु नये यासाठी स्वत: मध्ये सुधारणा करून घेतील अन्यथा परीणामांस तयार राहतील .. अर्थात हे स्वप्न रंजन झाले थोडेसे. हे नजीकच्या काळात होणे शक्य नाही पण यावर चर्चा झाल्यास सकारात्मक मानसिकता तयार होवू शकेल असे वाटते....
तर ही झाली माझ्या पोस्टमागील माझी मानसिक वैचारिक पार्श्वभूमी.
©श्रीरंग जाधव.
No comments:
Post a Comment