मला स्वत:ला पहिल्या बाजीरावाबद्दल ते अजिंक्य योद्धा होते, त्यांचे मस्तानी बरोबरचे प्रेमप्रकरण ( तिला पत्नीचा दर्जा दिला गेला होता हे मला आत्ता आत्ता येणाऱ्या WA पोस्ट्स वरुन कळलं ) आणि राऊंचा अंत अकाली रावेरखेडी येथे झाला एव्हढीच माहिती होती.
मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या " historical facts " ज्या सध्या सोशल मिडियावर पुढे येताहेत त्या तशा पुढे येण्यासाठी एका गाण्याच्या trigger ची जरूर का पडावी ?
हेच सत्यकथन आधी केलं असतं तर उत्स्फूर्तपणे सर्वसामान्य समाजाकडून याचा विरोध केला गेला असता. आज ह्याचं स्वरूप काही अभ्यासकांच्या विरोधाला अनुसरणारा विरोध असं रुप येऊन कळत नकळत त्याची धार बोथट झालीये अथवा होणार आहे.
किती मराठी माणसाना शिवाजी महाराजांशिवायचा मराठी इतिहास माहितीये ? तुमच्या राज्यात होऊन गेलेल्या महान ऐतिहासिक व्यक्तीना तुम्ही राष्ट्रीय स्तरावर अशी ओळख का मिळवून दिली नाही की त्यांचं खरं स्वरूप इतकं सर्वज्ञात असावं की असं विपरीत स्वरुप दाखवण्याची कुणाची हिम्मतच होऊ नये.
रिचर्ड अॅटनबॅरो नी गांधी काढला आणि गांधींची जगाला माहीत असलेली प्रतिमा समोर आली. तिथे विपर्यास होण्याला जागाच नव्हती. मग गांधी सर्व गुण संपन्न होते का ? एक व्यक्ती तसेच राजकारणी म्हणून त्यांच्यातही तृटी होत्याच की. पण त्यांच्या प्रतिमेचं marketing इतकं उत्कृष्ट झालय की होणारी निर्मिती करतानाच निर्मात्याला माहिती आहे की इथे वाट्टेल ते कला स्वातंत्र्य घेता येणार नाही.
ही जाणीव आणि जागरुकता सर्व पातळीवर येणं आवश्यक आहे.
याचा अर्थ असा नाही की मी चुकीच्या इतिहासाच्या सादरीकरणाचं समर्थन करतोय. मात्र आजकालची एकंदर विचारसरणी पहाता या नकारात्मक जाहिरातीचा अधिक फायदा भन्साली ला मिळेल कारण पक्की वैचारीक बैठक नसलेले बहुतांश लोक सोशल मिडीयावरील निषेधात हो ला हो मिळवून सिनेमा बघतील ( जर चित्रपट प्रदर्शित होण्यात अडचण आली नाही तर. ) .
टीपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढला म्हणून त्याच्यावर सिरीयल बनते आणि लोक बघतात. टीपू हा देशभक्त नव्हता. स्वत:चं राज्य टिकवण्यासाठी केलेली लढाई होती ती. पण आपल्याला कुठे फरक पडला ती सिरियल बघताना.
आपल्याला भव्य दिव्य सेट्स व आवडते कलाकार आणि करमणूक हेच महत्वाचे.
आज ह्या देशाच्या इतिहासात दोनच नावांचा उल्लेख होतो - गांधी आणि नेहरु. आता आता सरदार पटेल. या यादीत जो पर्यंत टिळक, सावरकर, राशबिहारी बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, महादजी शिंदे , मल्हारराव होळकर, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, पहिले माधवराव व इतर अनेकांचा उल्लेख तितक्याच आदरानी व not as a second line होणे चालू होणार नाही तो पर्यंत ह्या अप्रसिद्ध व्यक्तिमत्वांवरील कलाकृतीत असं स्वातंत्र्य वारंवार घेतलं जाईल.
-------- मनिष मोहिले
शबरी माला देवस्थाना च्या वादग्रस्त निर्णयावरचं प्रिया पाटील यांचं पोस्ट वाचलं. त्यांची ती पोटतिडीक मनाला भिडली. आजच्या स्त्री स्वातंत्र्याची महती गाणाऱ्या काळात असा एखादा मुद्दा उद्भवतो की जिथे समस्त स्त्री जातीच्या मनातील संतापाला वाचा फुटावी ही परिस्थितीच समाज खऱ्या अर्थानी प्रगल्भ झालाय का हा प्रश्न सर्वांसमोर आणते. वर्षानुवर्ष घराघरातून follow होणारी एक वेगळ्या प्रकारची " अस्पृश्यता " आज चव्हाट्यावर आणली गेलीये आणि तिचं तिथून उच्चाटन करताना आपली घरातील मानसिकता बदलणं देखील अतिशय आवश्यक आहे.
आजही घराघरातून स्त्रिया मासिक पाळीच्या काळात देव, धार्मिक कृत्य व स्थळे या पासून दूर रहातात - बालपणापासून मनावर जे संस्कार (??) बिंबवले गेले त्या मुळे. अंजली दीक्षित यांनी लिहील्याप्रमाणे आजही सणवार काळात गोळ्या घेऊन बायका पाळी पुढे ढकलतात. आज शतकानुशतके पिढ्या न पिढ्या ज्या रुढी परंपरा पाळल्या जातात - त्याबद्दल विरोधाचा शब्द न काढता त्याचा हा परिपाक.
माझे स्वत:चे विचार या बाबतीत स्पष्ट आहेत. जे आयुष्यक्रमाचा एक भाग म्हणून निसर्गानी / देवानी स्त्रीला दिलय ते घाण कसं म्हणता येइल ? त्यातूनही हे माहीत असताना की हे चक्र हे स्त्रीच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि तो मानवजातीच्या वृद्धीच्या दृष्टीनेही तितकाच महत्वाचा आहे, या मासिकधर्माच्या बाबतीत असा विचार करणं देखील नीच व शिक्षापात्र आहे.
माझ्यामते कोणतही धार्मिक अवडंबर यात माजवलं जाऊ नये. मासिक पाळीच्या वेळी धार्मिक कृत्य करावीत वा करू नयेत हा सर्वस्वी प्रत्येक स्त्रीचा स्वैच्छिक निर्णय असावा. तसं नसल्यास स्त्रियांच्या निर्णयस्वातंत्र्यावर हे एक बंधन आहे व त्यामुळे ते झुगारलच पाहीजे.
या बाबतीत स्त्री मुळात संवेदनशील असते. मासिक पाळी चालू असताना ती अधिक sensitive झालेली असते त्या शारीरिक बदलान्मुळे. अशा वेळी ही गोष्ट कोणाशी शेअर करावी वा नये हे सर्वस्वी तिच्या मनाप्रमाणे व्हावं आणि आपला समाज तर ह्याची जाहिरात करतो. आज ती जाहीर पणे केली गेली पण घराघरात मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रीला धार्मिक कृत्यातून वगळलं जातं तेव्हा तिची इच्छा असो वा नसो - ती जाहिरात होतच असते.
पूर्वीच्या काळी स्त्रियाना मासिक धर्माच्या काळात विश्रांती मिळावी म्हणून हे सुरू झालं असा एक वरवर पटणारा मुद्दा पुढे आला तरी त्यात ताकाला जाऊन भांडं लपवल्यासारखं होतं. विश्रांती द्यायची तर सरळ विश्रांती म्हणून बाजूला बसवा. त्यात देव कशाला ?
आणि जरी विश्रांती म्हणून बाजूला बसवलं तरी जाहिरात व्हायची थोडीच रहाते ?
खरंच प्रगल्भता असेल तर हा निर्णय त्या त्या स्त्रीवर सोडून तिच्या निर्णयाला सादर स्विकारता यायला हवं.
पण दुर्दैवाने आपल्या समाजाचा पहिल्यापासून हा दुटप्पीपणा आहे. कुठलीही गोष्ट तर्क आणि तत्व व मूल्य यावर चांगली किंवा वाईट कशी हे पूर्णतया तार्किक तात्विक व मूल्याधिष्ठित न समजावता त्यात देव धर्म हे घुसडायचं. का ?
जेव्हा प्रत्येक घरातून या दुटप्पीपणाची उचलबांगडी होइल तेव्हा शबरीमालाचं दर्शन खऱ्या अर्थानी खुलं होइल.
------ मनिष मोहिले
राष्ट्रगीत सुरू झाल्यावर, मग स्थळ कोणतेही असो, आपण जर नैसर्गिक विधी करण्यात बिझी नसलो तर 52 सेकंद उभे राहून राष्ट्रगीताचा योग्य मान राखण्यात काहीच प्रत्यवाय नसावा.
सध्या एक फॅशन आल्यासारखं झालंय - प्रस्थापित गोष्टींच्या विरूद्ध घडणाऱ्या घटनांचं समर्थन करून आम्ही दोन्ही बाजूंचा साधक बाधक व समतोल विचार करतो अशी स्वत:लाच शाबासकी द्यायची.
देशानी मला काही दिलं नाही की ज्यामुळे मला आदर वाटेल म्हणणाऱ्या मंडळीनी आपण देशाला काय दिलय याचा स्वत:च्या गिरेबान में झाकके विचार करावा.
ज्या देशात तुम्ही राहता, तेथील resources वापरता त्या देशासाठी इतर कुठलंही कृतीशील योगदान करता येत नसेल तरी त्याच्या राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी काही सेकंद उभे रहाण्यात प्रश्न का पडावा ?
राष्ट्रीयत्वाच्या भावनेच्या जोपासनेची सुरूवात अशाच non descript गोष्टीतून होत असते.
------ मनिष मोहिले
मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या " historical facts " ज्या सध्या सोशल मिडियावर पुढे येताहेत त्या तशा पुढे येण्यासाठी एका गाण्याच्या trigger ची जरूर का पडावी ?
हेच सत्यकथन आधी केलं असतं तर उत्स्फूर्तपणे सर्वसामान्य समाजाकडून याचा विरोध केला गेला असता. आज ह्याचं स्वरूप काही अभ्यासकांच्या विरोधाला अनुसरणारा विरोध असं रुप येऊन कळत नकळत त्याची धार बोथट झालीये अथवा होणार आहे.
किती मराठी माणसाना शिवाजी महाराजांशिवायचा मराठी इतिहास माहितीये ? तुमच्या राज्यात होऊन गेलेल्या महान ऐतिहासिक व्यक्तीना तुम्ही राष्ट्रीय स्तरावर अशी ओळख का मिळवून दिली नाही की त्यांचं खरं स्वरूप इतकं सर्वज्ञात असावं की असं विपरीत स्वरुप दाखवण्याची कुणाची हिम्मतच होऊ नये.
रिचर्ड अॅटनबॅरो नी गांधी काढला आणि गांधींची जगाला माहीत असलेली प्रतिमा समोर आली. तिथे विपर्यास होण्याला जागाच नव्हती. मग गांधी सर्व गुण संपन्न होते का ? एक व्यक्ती तसेच राजकारणी म्हणून त्यांच्यातही तृटी होत्याच की. पण त्यांच्या प्रतिमेचं marketing इतकं उत्कृष्ट झालय की होणारी निर्मिती करतानाच निर्मात्याला माहिती आहे की इथे वाट्टेल ते कला स्वातंत्र्य घेता येणार नाही.
ही जाणीव आणि जागरुकता सर्व पातळीवर येणं आवश्यक आहे.
याचा अर्थ असा नाही की मी चुकीच्या इतिहासाच्या सादरीकरणाचं समर्थन करतोय. मात्र आजकालची एकंदर विचारसरणी पहाता या नकारात्मक जाहिरातीचा अधिक फायदा भन्साली ला मिळेल कारण पक्की वैचारीक बैठक नसलेले बहुतांश लोक सोशल मिडीयावरील निषेधात हो ला हो मिळवून सिनेमा बघतील ( जर चित्रपट प्रदर्शित होण्यात अडचण आली नाही तर. ) .
टीपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढला म्हणून त्याच्यावर सिरीयल बनते आणि लोक बघतात. टीपू हा देशभक्त नव्हता. स्वत:चं राज्य टिकवण्यासाठी केलेली लढाई होती ती. पण आपल्याला कुठे फरक पडला ती सिरियल बघताना.
आपल्याला भव्य दिव्य सेट्स व आवडते कलाकार आणि करमणूक हेच महत्वाचे.
आज ह्या देशाच्या इतिहासात दोनच नावांचा उल्लेख होतो - गांधी आणि नेहरु. आता आता सरदार पटेल. या यादीत जो पर्यंत टिळक, सावरकर, राशबिहारी बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, महादजी शिंदे , मल्हारराव होळकर, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, पहिले माधवराव व इतर अनेकांचा उल्लेख तितक्याच आदरानी व not as a second line होणे चालू होणार नाही तो पर्यंत ह्या अप्रसिद्ध व्यक्तिमत्वांवरील कलाकृतीत असं स्वातंत्र्य वारंवार घेतलं जाईल.
-------- मनिष मोहिले
शबरी माला देवस्थाना च्या वादग्रस्त निर्णयावरचं प्रिया पाटील यांचं पोस्ट वाचलं. त्यांची ती पोटतिडीक मनाला भिडली. आजच्या स्त्री स्वातंत्र्याची महती गाणाऱ्या काळात असा एखादा मुद्दा उद्भवतो की जिथे समस्त स्त्री जातीच्या मनातील संतापाला वाचा फुटावी ही परिस्थितीच समाज खऱ्या अर्थानी प्रगल्भ झालाय का हा प्रश्न सर्वांसमोर आणते. वर्षानुवर्ष घराघरातून follow होणारी एक वेगळ्या प्रकारची " अस्पृश्यता " आज चव्हाट्यावर आणली गेलीये आणि तिचं तिथून उच्चाटन करताना आपली घरातील मानसिकता बदलणं देखील अतिशय आवश्यक आहे.
आजही घराघरातून स्त्रिया मासिक पाळीच्या काळात देव, धार्मिक कृत्य व स्थळे या पासून दूर रहातात - बालपणापासून मनावर जे संस्कार (??) बिंबवले गेले त्या मुळे. अंजली दीक्षित यांनी लिहील्याप्रमाणे आजही सणवार काळात गोळ्या घेऊन बायका पाळी पुढे ढकलतात. आज शतकानुशतके पिढ्या न पिढ्या ज्या रुढी परंपरा पाळल्या जातात - त्याबद्दल विरोधाचा शब्द न काढता त्याचा हा परिपाक.
माझे स्वत:चे विचार या बाबतीत स्पष्ट आहेत. जे आयुष्यक्रमाचा एक भाग म्हणून निसर्गानी / देवानी स्त्रीला दिलय ते घाण कसं म्हणता येइल ? त्यातूनही हे माहीत असताना की हे चक्र हे स्त्रीच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि तो मानवजातीच्या वृद्धीच्या दृष्टीनेही तितकाच महत्वाचा आहे, या मासिकधर्माच्या बाबतीत असा विचार करणं देखील नीच व शिक्षापात्र आहे.
माझ्यामते कोणतही धार्मिक अवडंबर यात माजवलं जाऊ नये. मासिक पाळीच्या वेळी धार्मिक कृत्य करावीत वा करू नयेत हा सर्वस्वी प्रत्येक स्त्रीचा स्वैच्छिक निर्णय असावा. तसं नसल्यास स्त्रियांच्या निर्णयस्वातंत्र्यावर हे एक बंधन आहे व त्यामुळे ते झुगारलच पाहीजे.
या बाबतीत स्त्री मुळात संवेदनशील असते. मासिक पाळी चालू असताना ती अधिक sensitive झालेली असते त्या शारीरिक बदलान्मुळे. अशा वेळी ही गोष्ट कोणाशी शेअर करावी वा नये हे सर्वस्वी तिच्या मनाप्रमाणे व्हावं आणि आपला समाज तर ह्याची जाहिरात करतो. आज ती जाहीर पणे केली गेली पण घराघरात मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रीला धार्मिक कृत्यातून वगळलं जातं तेव्हा तिची इच्छा असो वा नसो - ती जाहिरात होतच असते.
पूर्वीच्या काळी स्त्रियाना मासिक धर्माच्या काळात विश्रांती मिळावी म्हणून हे सुरू झालं असा एक वरवर पटणारा मुद्दा पुढे आला तरी त्यात ताकाला जाऊन भांडं लपवल्यासारखं होतं. विश्रांती द्यायची तर सरळ विश्रांती म्हणून बाजूला बसवा. त्यात देव कशाला ?
आणि जरी विश्रांती म्हणून बाजूला बसवलं तरी जाहिरात व्हायची थोडीच रहाते ?
खरंच प्रगल्भता असेल तर हा निर्णय त्या त्या स्त्रीवर सोडून तिच्या निर्णयाला सादर स्विकारता यायला हवं.
पण दुर्दैवाने आपल्या समाजाचा पहिल्यापासून हा दुटप्पीपणा आहे. कुठलीही गोष्ट तर्क आणि तत्व व मूल्य यावर चांगली किंवा वाईट कशी हे पूर्णतया तार्किक तात्विक व मूल्याधिष्ठित न समजावता त्यात देव धर्म हे घुसडायचं. का ?
जेव्हा प्रत्येक घरातून या दुटप्पीपणाची उचलबांगडी होइल तेव्हा शबरीमालाचं दर्शन खऱ्या अर्थानी खुलं होइल.
------ मनिष मोहिले
राष्ट्रगीत सुरू झाल्यावर, मग स्थळ कोणतेही असो, आपण जर नैसर्गिक विधी करण्यात बिझी नसलो तर 52 सेकंद उभे राहून राष्ट्रगीताचा योग्य मान राखण्यात काहीच प्रत्यवाय नसावा.
सध्या एक फॅशन आल्यासारखं झालंय - प्रस्थापित गोष्टींच्या विरूद्ध घडणाऱ्या घटनांचं समर्थन करून आम्ही दोन्ही बाजूंचा साधक बाधक व समतोल विचार करतो अशी स्वत:लाच शाबासकी द्यायची.
देशानी मला काही दिलं नाही की ज्यामुळे मला आदर वाटेल म्हणणाऱ्या मंडळीनी आपण देशाला काय दिलय याचा स्वत:च्या गिरेबान में झाकके विचार करावा.
ज्या देशात तुम्ही राहता, तेथील resources वापरता त्या देशासाठी इतर कुठलंही कृतीशील योगदान करता येत नसेल तरी त्याच्या राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी काही सेकंद उभे रहाण्यात प्रश्न का पडावा ?
राष्ट्रीयत्वाच्या भावनेच्या जोपासनेची सुरूवात अशाच non descript गोष्टीतून होत असते.
------ मनिष मोहिले
No comments:
Post a Comment