निवृत्ती - एक आयोजन
या पूर्वी एकदा मी या विषयावर कदाचित एक छोटंसं पोस्ट लिहीलं होतं पण आज थोडी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न आहे.
आजपासून सात आठ वर्षापूर्वी (मी तेव्हा ३७-३८ वर्षांचा असीन) मी निवृत्ती आयोजन ( Retirement Planning ) हा शब्द पहिल्यांदी ऐकला. गुंतवणूक आयोजनाबद्दल मार्गदर्शन करू शकणाऱ्या योग्य व्यक्तीच्या शोधात होतो त्यावेळी. तेव्हा माझ्या मित्रानी मला ह्या व्यक्तीशी ओळख करून दिली ज्यानं स्वत:चा व्यवसाय Retirement Planner असा आहे असं सांगितलं. त्यावेळी त्यानं एक तासाभराचं presentation दिलं आणि गेली आठ वर्ष मी त्याच्याशी संलग्न आहे. गंमत म्हणजे ज्या मित्रानी आमची ओळख करून दिली तो मात्र अजून ही ह्यात पडलेला नाही. असो.
तर इतक्या वर्षातील आमच्या अनेक भेटी गाठी, त्या व्यक्तीनी दिलेली presentations, आयोजित केलेले seminars / workshops ह्यातून मला जे समजलं ते समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
निवृत्ती आयोजनाला सुरूवात करताना सर्वात आवश्यक आहे त्याबद्दलची डोळस जाणीव. आपण आपल्या रोजच्या व्यापात इतके गर्क असतो की दिवस किती पटापट जातात हे जाणवत असून आणि आपण बोलत असून सुद्धा निवृत्तीच्या संदर्भात आपण विचारच करत नाही. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीत, काटकसरीच्या जीवनशैलीत जिथे एकविसाव्या वर्षापासून ते साठाव्या वर्षापर्यंतच्या नोकरीत चाळीस वर्ष कमाई आणि निवृत्तीनंतर साधारण दहा वर्षांचा आयुष्यावधी असा हिशोब होता त्याच्या जागी सव्वीस सत्तावीसाव्या वर्षी शिक्षण संपवून नोकरी / धंद्यास सुरूवात, प्रगत वैद्यकशास्त्रामुळे वाढलेलं आयुर्मान व त्यामुळे निवृत्तीनंतर वीसेक वर्षाचा आयुष्यावधी आणि विभक्त कुटुंबपद्धती असा मोठा फरक आहे. चाळीस वर्षांच्या कमाईवर दहा वर्ष काढणं आणि तीस वर्षांच्या कमाईवर तुलनेनी अधिक खर्चिक वीस वर्षं काढणं यात दुसरी परिस्थिती अधिक कठीण आहे. त्यामुळे निवृत्ती आयोजनाचा विचार करणं आणि कमावत्या आयुष्याच्या शक्य तितक्या सुरूवातीस करणं हे फायदेशीर आहे.
ढोबळमानाने, निवृत्ती आयोजन करताना खालील बाबींचा विचार करायला हवा.
आर्थिक - सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक सुरक्षितता. भविष्यात आपण निवृत्त होऊ त्यावेळी एक निश्चित मासिक उत्पन्न नसताना सुद्धा आपल्याला त्यावेळच्या बाजारभावांप्रमाणे, कमीत कमी आपली आजची जीवनशैली आणि जीवनमान सुलभ आणि सुखद पणे कसे टिकवता येतील हे आयोजन अत्यावश्यक आहे.
त्यासाठी सगळ्यात आवश्यक आहे आजच्या तारखेचा cashflow - उत्पन्नाची आवक जावक. दैनंदिन खर्च भागवल्यानंतर त्या cashflow मधील बचत क्षमतेचा अंदाज. त्यानंतर आपण आपल्या आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर आहोत त्याप्रमाणे अपेक्षित पडाव व त्याच्याशी निगडित अंदाजे खर्च - उदा. घर घेणे, गाडी घेणे, लग्न, मुलांचा जन्म, त्यांचं शिक्षण, वार्षिक सहली, मुलांची लग्न, आई वडिल अवलंबून असल्यास त्यांचं औषधपाणी आणि त्यानंतर स्वत:ची निवृत्ती आणि स्वत:च्या पश्चात जोडीदाराच्या उर्वरित आयुष्याची सोय.
या सर्व गोष्टी आणि महागाई दर व विविध प्रकारच्या गुंतवणूकींचा सरासरी परतफेड दर व साधारण आयुर्मर्यादा लक्षात घेऊन, अपेक्षित पडावांसाठी वेळोवेळीच्या खर्चाची तरतूद केल्यानंतर, निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी तेव्हाच्या बाजारभावाच्या संदर्भात कमीत कमी आत्ताच्या जीवनशैली व जीवनमाना प्रमाणे जगता येण्यासाठी किती गंगाजळी असायला हवी हे निश्चित करायला हवं. यासाठी साचेबंद आकडेमोड तक्ते असतात ज्यात आवश्यक माहिती भरली की ही गंगाजळी किती असायला हवी ते आपल्याला कळतं. त्या लक्ष्याच्या दिशेने पद्धतशीर वाटचाल करणं ही या निवृत्ती आयोजनाची अंमलबजावणी.
यात सर्वात आवश्यक आहे पुरेसा आयुर्विमा जो अनपेक्षित धक्क्यांची काळजी घेऊ शकेल. त्यानंतर लांब पल्ल्याचे (दीर्घ मुदतीसाठी) बचत आयोजन.
यात महत्वाची गोष्ट म्हणजे Debt आणि equity यातील समतोल - थोडक्यात गुंतवणूकीवरील निश्चित व अनिश्चित परतफेड यातील असा समतोल ज्यायोगे महागाईला मात देऊ शकणारी परतफेड मिळावी.
हे करताना महागाई दर आणि वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांचे भूतकाळातील गुंतवणूक परतफेड दर आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या संदर्भात त्यांचे भविष्यातील अंदाजित अपेक्षित परतफेड दर यांचा अभ्यास करून गुंतवणूक करणं आवश्यक आहे. सुरूवातीच्या काळात जेव्हा अधिक धोका पत्करण्याची आपली क्षमता असते तेव्हा equity dominant गुंतवणूक आणि निवृत्तीच्या जवळ आल्यावर debt dominant गुंतवणूक हे एक ढोबळ सूत्र आहे.
यामध्ये Systematic Investment Plan (SIP) पद्धतशीर गुंतवणूक योजना हे एक चांगलं गुंतवणूक माध्यम आहे.
दुसरी तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे थोडा नफा किंवा तोटा दिसताच गुंतवणूक तोडणे हे अगदी चुकीचं आहे. पैसा जेवढा अधिक काळासाठी गुंतलेला राहील; तेवढा बाजाराच्या चढ उतार चक्राला निष्प्रभ करत, पैशाची चक्रवाढीची ताकद गुंतवलेला पैसा वाढवायला मदत करेल.
अर्थातच यात वेळोवेळी आपल्या एकंदर गुंतवणूकीचे अवलोकन करणे, बाजारस्थितीचे अवलोकन करणे व आवश्यक तिथे आपल्या गुंतवणूक आयोजनात फेरबदल करणे हे ओघानेच आले. यासाठी स्वत: नसल्यास एखाद्या जाणकार व विश्वासू अशा व्यावसायिक तज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन आवश्यक आहे - अशी व्यक्ती जी निव्वळ वेगवेगळ्या योजना तुम्हाला विकून स्वस्थ बसणार नाही तर वरील सर्व गोष्टींचा अभ्यास व विश्लेषण करून तुम्हाला योग्य सल्ला देइल व मार्गदर्शन करेल.
आपल्याला कदाचित नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक व गुंतवणूकदार या चौकोनाबद्दल माहिती असेल. यातील सर्वात वरची पायरी गुंतवणूकदाराची जिथे गुंतवलेला पैसाच गुंतवणूकदारासाठी उत्पन्न मिळवतो. त्या पायरीवर पोचणे हे आपलं उद्दीष्ट असायला हवं आणि त्यासाठी जेवढ्या लवकर सुरूवात करू तेवढं उत्तम.
निवृत्ती काळातील समय नियोजन - निवृत्ती ही सुरक्षित असण्याबरोबरच समाधानी देखील असणं अतिशय गरजेचं आहे. समाधानी निवृत्तीचा विचार करताना नुसती आर्थिक बाजू सुरक्षित करून उपयोग नाही. आपला नोकरी / व्यवसाय; ज्यात दिवसातील जास्तीत जास्त वेळ जातो, ती गोष्ट दिनचर्येचा भाग नाही म्हटल्यावर जो भरपूर मोकळा वेळ आपल्याला मिळेल; त्याचा आपल्याला आनंद मिळेल, समाधान मिळेल अशा पद्धतीने व्यय करण्यासाठी काही छंद , एखादं हलकं फुलकं काम ( समाजपयोगी असल्यास उत्तम), समानशील व समवयस्क मित्रपरिवार असे विविध पर्याय उपलब्ध हवेत. पर्यटन हा ही एक उत्तम पर्याय होऊ शकतो. या गोष्टीचा विचार अगदी सुरूवातीला नाही तरी निवृत्ती जवळ यायला लागल्यावर हवाच हवा.
आरोग्य - वरील सर्व आनंद अनुभवायचे असतील, आणि कष्टानी जमा केलेल्या गंगाजळीचा उपभोग घेत सुखी समाधानी व सुरक्षित निवृत्ती अनुभवायची असेल तर मुळात आपलं आरोग्य चांगलं हवं. नाहीतर औषधपाण्यावरच पैसा आणि वेळ खर्च व्हायचा. त्यासाठी आत्तापासून आपली जीवनशैली अशी बनवायला हवी ज्यायोगे उतारवयात अनारोग्याची समस्या कमीत कमी भेडसावेल. चांगल्या दिनचर्येच्या सवयी शक्य तितक्या लवकर अंगी बाणवाव्यात आणि ही अशी गोष्ट आहे की जिचा फायदा आयुष्यभरासाठी आहे.
या सगळ्या आयोजनाबरोबरच आवश्यक आहे सर्व गुंतवणूकी, विमे, मालमत्ता ह्यांच्या व्यवस्थित नोंदी आणि आपल्या जोडीदाराला व वारसदाराला त्या नोंदींची माहिती असणं. आजकालच्या काळात कर्त्या पुरूषाबरोबरच गृहिणीला देखील याबाबत पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. कमावत्या स्त्रियांनी स्वत:च्या निवृत्तीचं आयोजन करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे.
विशेषत: भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात जिथे निवृत्तीपर सरकारी मदत (वैद्यकीय खर्च, निवृत्ती भत्ता) या गोष्टी फारच कमी लोकांपुरत्या उपलब्ध असतात तिथे तर निवृत्ती आयोजनाची विशेष गरज आहे.
-- मनिष मोहिले
या पूर्वी एकदा मी या विषयावर कदाचित एक छोटंसं पोस्ट लिहीलं होतं पण आज थोडी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न आहे.
आजपासून सात आठ वर्षापूर्वी (मी तेव्हा ३७-३८ वर्षांचा असीन) मी निवृत्ती आयोजन ( Retirement Planning ) हा शब्द पहिल्यांदी ऐकला. गुंतवणूक आयोजनाबद्दल मार्गदर्शन करू शकणाऱ्या योग्य व्यक्तीच्या शोधात होतो त्यावेळी. तेव्हा माझ्या मित्रानी मला ह्या व्यक्तीशी ओळख करून दिली ज्यानं स्वत:चा व्यवसाय Retirement Planner असा आहे असं सांगितलं. त्यावेळी त्यानं एक तासाभराचं presentation दिलं आणि गेली आठ वर्ष मी त्याच्याशी संलग्न आहे. गंमत म्हणजे ज्या मित्रानी आमची ओळख करून दिली तो मात्र अजून ही ह्यात पडलेला नाही. असो.
तर इतक्या वर्षातील आमच्या अनेक भेटी गाठी, त्या व्यक्तीनी दिलेली presentations, आयोजित केलेले seminars / workshops ह्यातून मला जे समजलं ते समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
निवृत्ती आयोजनाला सुरूवात करताना सर्वात आवश्यक आहे त्याबद्दलची डोळस जाणीव. आपण आपल्या रोजच्या व्यापात इतके गर्क असतो की दिवस किती पटापट जातात हे जाणवत असून आणि आपण बोलत असून सुद्धा निवृत्तीच्या संदर्भात आपण विचारच करत नाही. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीत, काटकसरीच्या जीवनशैलीत जिथे एकविसाव्या वर्षापासून ते साठाव्या वर्षापर्यंतच्या नोकरीत चाळीस वर्ष कमाई आणि निवृत्तीनंतर साधारण दहा वर्षांचा आयुष्यावधी असा हिशोब होता त्याच्या जागी सव्वीस सत्तावीसाव्या वर्षी शिक्षण संपवून नोकरी / धंद्यास सुरूवात, प्रगत वैद्यकशास्त्रामुळे वाढलेलं आयुर्मान व त्यामुळे निवृत्तीनंतर वीसेक वर्षाचा आयुष्यावधी आणि विभक्त कुटुंबपद्धती असा मोठा फरक आहे. चाळीस वर्षांच्या कमाईवर दहा वर्ष काढणं आणि तीस वर्षांच्या कमाईवर तुलनेनी अधिक खर्चिक वीस वर्षं काढणं यात दुसरी परिस्थिती अधिक कठीण आहे. त्यामुळे निवृत्ती आयोजनाचा विचार करणं आणि कमावत्या आयुष्याच्या शक्य तितक्या सुरूवातीस करणं हे फायदेशीर आहे.
ढोबळमानाने, निवृत्ती आयोजन करताना खालील बाबींचा विचार करायला हवा.
आर्थिक - सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक सुरक्षितता. भविष्यात आपण निवृत्त होऊ त्यावेळी एक निश्चित मासिक उत्पन्न नसताना सुद्धा आपल्याला त्यावेळच्या बाजारभावांप्रमाणे, कमीत कमी आपली आजची जीवनशैली आणि जीवनमान सुलभ आणि सुखद पणे कसे टिकवता येतील हे आयोजन अत्यावश्यक आहे.
त्यासाठी सगळ्यात आवश्यक आहे आजच्या तारखेचा cashflow - उत्पन्नाची आवक जावक. दैनंदिन खर्च भागवल्यानंतर त्या cashflow मधील बचत क्षमतेचा अंदाज. त्यानंतर आपण आपल्या आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर आहोत त्याप्रमाणे अपेक्षित पडाव व त्याच्याशी निगडित अंदाजे खर्च - उदा. घर घेणे, गाडी घेणे, लग्न, मुलांचा जन्म, त्यांचं शिक्षण, वार्षिक सहली, मुलांची लग्न, आई वडिल अवलंबून असल्यास त्यांचं औषधपाणी आणि त्यानंतर स्वत:ची निवृत्ती आणि स्वत:च्या पश्चात जोडीदाराच्या उर्वरित आयुष्याची सोय.
या सर्व गोष्टी आणि महागाई दर व विविध प्रकारच्या गुंतवणूकींचा सरासरी परतफेड दर व साधारण आयुर्मर्यादा लक्षात घेऊन, अपेक्षित पडावांसाठी वेळोवेळीच्या खर्चाची तरतूद केल्यानंतर, निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी तेव्हाच्या बाजारभावाच्या संदर्भात कमीत कमी आत्ताच्या जीवनशैली व जीवनमाना प्रमाणे जगता येण्यासाठी किती गंगाजळी असायला हवी हे निश्चित करायला हवं. यासाठी साचेबंद आकडेमोड तक्ते असतात ज्यात आवश्यक माहिती भरली की ही गंगाजळी किती असायला हवी ते आपल्याला कळतं. त्या लक्ष्याच्या दिशेने पद्धतशीर वाटचाल करणं ही या निवृत्ती आयोजनाची अंमलबजावणी.
यात सर्वात आवश्यक आहे पुरेसा आयुर्विमा जो अनपेक्षित धक्क्यांची काळजी घेऊ शकेल. त्यानंतर लांब पल्ल्याचे (दीर्घ मुदतीसाठी) बचत आयोजन.
यात महत्वाची गोष्ट म्हणजे Debt आणि equity यातील समतोल - थोडक्यात गुंतवणूकीवरील निश्चित व अनिश्चित परतफेड यातील असा समतोल ज्यायोगे महागाईला मात देऊ शकणारी परतफेड मिळावी.
हे करताना महागाई दर आणि वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांचे भूतकाळातील गुंतवणूक परतफेड दर आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या संदर्भात त्यांचे भविष्यातील अंदाजित अपेक्षित परतफेड दर यांचा अभ्यास करून गुंतवणूक करणं आवश्यक आहे. सुरूवातीच्या काळात जेव्हा अधिक धोका पत्करण्याची आपली क्षमता असते तेव्हा equity dominant गुंतवणूक आणि निवृत्तीच्या जवळ आल्यावर debt dominant गुंतवणूक हे एक ढोबळ सूत्र आहे.
यामध्ये Systematic Investment Plan (SIP) पद्धतशीर गुंतवणूक योजना हे एक चांगलं गुंतवणूक माध्यम आहे.
दुसरी तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे थोडा नफा किंवा तोटा दिसताच गुंतवणूक तोडणे हे अगदी चुकीचं आहे. पैसा जेवढा अधिक काळासाठी गुंतलेला राहील; तेवढा बाजाराच्या चढ उतार चक्राला निष्प्रभ करत, पैशाची चक्रवाढीची ताकद गुंतवलेला पैसा वाढवायला मदत करेल.
अर्थातच यात वेळोवेळी आपल्या एकंदर गुंतवणूकीचे अवलोकन करणे, बाजारस्थितीचे अवलोकन करणे व आवश्यक तिथे आपल्या गुंतवणूक आयोजनात फेरबदल करणे हे ओघानेच आले. यासाठी स्वत: नसल्यास एखाद्या जाणकार व विश्वासू अशा व्यावसायिक तज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन आवश्यक आहे - अशी व्यक्ती जी निव्वळ वेगवेगळ्या योजना तुम्हाला विकून स्वस्थ बसणार नाही तर वरील सर्व गोष्टींचा अभ्यास व विश्लेषण करून तुम्हाला योग्य सल्ला देइल व मार्गदर्शन करेल.
आपल्याला कदाचित नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक व गुंतवणूकदार या चौकोनाबद्दल माहिती असेल. यातील सर्वात वरची पायरी गुंतवणूकदाराची जिथे गुंतवलेला पैसाच गुंतवणूकदारासाठी उत्पन्न मिळवतो. त्या पायरीवर पोचणे हे आपलं उद्दीष्ट असायला हवं आणि त्यासाठी जेवढ्या लवकर सुरूवात करू तेवढं उत्तम.
निवृत्ती काळातील समय नियोजन - निवृत्ती ही सुरक्षित असण्याबरोबरच समाधानी देखील असणं अतिशय गरजेचं आहे. समाधानी निवृत्तीचा विचार करताना नुसती आर्थिक बाजू सुरक्षित करून उपयोग नाही. आपला नोकरी / व्यवसाय; ज्यात दिवसातील जास्तीत जास्त वेळ जातो, ती गोष्ट दिनचर्येचा भाग नाही म्हटल्यावर जो भरपूर मोकळा वेळ आपल्याला मिळेल; त्याचा आपल्याला आनंद मिळेल, समाधान मिळेल अशा पद्धतीने व्यय करण्यासाठी काही छंद , एखादं हलकं फुलकं काम ( समाजपयोगी असल्यास उत्तम), समानशील व समवयस्क मित्रपरिवार असे विविध पर्याय उपलब्ध हवेत. पर्यटन हा ही एक उत्तम पर्याय होऊ शकतो. या गोष्टीचा विचार अगदी सुरूवातीला नाही तरी निवृत्ती जवळ यायला लागल्यावर हवाच हवा.
आरोग्य - वरील सर्व आनंद अनुभवायचे असतील, आणि कष्टानी जमा केलेल्या गंगाजळीचा उपभोग घेत सुखी समाधानी व सुरक्षित निवृत्ती अनुभवायची असेल तर मुळात आपलं आरोग्य चांगलं हवं. नाहीतर औषधपाण्यावरच पैसा आणि वेळ खर्च व्हायचा. त्यासाठी आत्तापासून आपली जीवनशैली अशी बनवायला हवी ज्यायोगे उतारवयात अनारोग्याची समस्या कमीत कमी भेडसावेल. चांगल्या दिनचर्येच्या सवयी शक्य तितक्या लवकर अंगी बाणवाव्यात आणि ही अशी गोष्ट आहे की जिचा फायदा आयुष्यभरासाठी आहे.
या सगळ्या आयोजनाबरोबरच आवश्यक आहे सर्व गुंतवणूकी, विमे, मालमत्ता ह्यांच्या व्यवस्थित नोंदी आणि आपल्या जोडीदाराला व वारसदाराला त्या नोंदींची माहिती असणं. आजकालच्या काळात कर्त्या पुरूषाबरोबरच गृहिणीला देखील याबाबत पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. कमावत्या स्त्रियांनी स्वत:च्या निवृत्तीचं आयोजन करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे.
विशेषत: भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात जिथे निवृत्तीपर सरकारी मदत (वैद्यकीय खर्च, निवृत्ती भत्ता) या गोष्टी फारच कमी लोकांपुरत्या उपलब्ध असतात तिथे तर निवृत्ती आयोजनाची विशेष गरज आहे.
-- मनिष मोहिले
No comments:
Post a Comment